
IRCTC Tatkal Ticket | जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. रेल्वेने असे अनेक महत्त्वाचे नियम बनवले आहेत, ज्यामुळे तुमचा प्रवास सुकर होऊ शकतो. पण बहुतांश प्रवाशांना या नियमांची माहिती नसते. भारतीय रेल्वे हा भारताचा कणा मानला जातो आणि त्यात दररोज सुमारे अडीच कोटी लोक प्रवास करतात. पण अनेकदा अचानक प्रवास करावा लागला तर रेल्वेचं तिकीट मिळण्यात अडचण येते. अशा परिस्थितीत तात्काळ तिकिटाचा पर्याय आहे. पण लगेचच कन्फर्म ई-तिकीट बुक करणं हे देखील मोठं आव्हान आहे. जाणून घेऊयात तात्काळ तिकिटांशी संबंधित अनिवार्य नियम, ज्यामुळे तुम्हाला तिकीट मिळणं सोपं होईल.
काय आहेत ई-तिकीट बुकिंगचे नियम?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसी युजर्स आपल्या आयडीने तात्काळ ई-तिकिटावर प्रति पीएनआर जास्तीत जास्त 4 प्रवासी बुक करू शकतात. म्हणजेच एका पीएनआरवर 4 जणांसाठी तिकीट काढता येणार आहे. अशात तुम्हीही तात्काळ तिकीट घेणार असाल तर हा नियम नक्की जाणून घ्या.
रिफंड मिळणार नाही
आता हे जाणून घेणे गरजेचे आहे की साधारणतः तिकीट रद्द केल्यावर रिफंड असतो, परंतु कन्फर्म तत्काल तिकिटे रद्द केल्यावर रिफंड मिळत नाही, तर प्रतीक्षा यादीसह तात्काळ तिकीट रद्द केल्यास सध्याच्या रेल्वे नियमानुसार शुल्क वजा केले जाते. म्हणजेच तात्काळ तिकिटातील कन्फर्म तिकीट रद्द केल्यास तुमचे नुकसान होईल.
IRCTC वापरकर्ते 24 तिकिटे बुक करू शकतात
रेल्वे वेळोवेळी नियमात बदल करत असते, त्यामुळे प्रवाशांची सोय होते. नुकतंच रेल्वेनं ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केला आहे. यानुसार जर तुमचं आयआरसीटीसी अकाऊंट तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर तुम्ही IRCTC युजर आयडीने जास्तीत जास्त 24 ट्रेन तिकीट बुक करू शकता, तर तुमचा आधार लिंक नसेल तर तुम्ही बीएस 12 तिकीटंच बुक करू शकता. यापूर्वी तुम्ही आधारशिवाय 6 तिकीट बुक करू शकत होता, तर आधार लिंक्ड आयडीने 12 तिकीट बुक करता येत होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.