
Railway Ticket Booking | आपल्या भारतात सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे रेल्वे हे एकमेव वाहतुकीचे साधन आहे. कारण की इथे वेगवेगळे रूट आहेत आणि वेगवेगळ्या रूटप्रमाणे काही रूटवर लोकांची जास्तीत जास्त संख्या पाहायला मिळते. अशा परिस्थितीत ट्रेनमधील प्रत्येक श्रेणीसाठी रेल्वे टिकीट बुकिंगची वेगवेगळी प्रोसेस असते. परंतु अनेकांना ही प्रोसेस ठाऊकच नसते.
प्रोसेस ठाऊक नसल्याकारणाने नवीन व्यक्ती ज्या दिवशी प्रवास करायचा असतो त्याच दिवशी कन्फर्म तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्रचंड गर्दीमुळे त्यांचं तिकीट कॅन्सल होतं आणि त्यांना कन्फर्म तिकीट किंवा जनरल कॅटेगिरीमधील टिकीट मिळणे देखील मुश्किल होते. ज्या व्यक्तींना रेल्वेचे सर्व नियम ठाऊक आहेत ते काही दिवसांआधीच प्रवासाचे तिकीट बुक करून ठेवतात.
तुम्हाला देखील सुखकर प्रवास करून कोणाचीही कटकट न ऐकता तुमच्या डेस्टिनेशनवर पोहोचायचं असेल तर, रेल्वेच्या संपूर्ण नियमाबद्दल तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे ट्रेन सुटण्याच्या किती दिवसआधी तिकीट बुक केलं तर तुमचा प्रवास सुखकर होईल जाणून घ्या.
रेल्वे टिकीट कधी बुक कराल :
तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल किंवा कमी वेळाचं अंतर पार करायचं असेल तर, तुम्ही चक्क 4 महिन्यांनाआधी रेल्वे टिकीट बुक करू शकता. भारतीय रेल्वे तिकीटाचा नियम असं सांगतो की, ट्रेन सुटण्याच्या 120 दिवसांआधी तुम्ही तुमचं हक्काचं कन्फर्म तिकीट बुक करू शकता. तिकिटाच्या वेळेबद्दल सांगायचे झाले तर, 3 एसी आणि आणखीन वरच्या प्रवर्गासाठी तिकीट बुक करण्याकरिता तुम्हाला सकाळी 10 वाजता पासूनची वेळ दिली जाते. त्यानंतर स्लीपर आणि तात्काळ तिकीट बुकिंग करण्यासाठी 11 वाजेपासून वेळ दिली जाते.
जनरल तिकिटाचा नियम काय सांगतो पहा :
जनरल डब्यातून प्रवास करायचा असेल तर, तुम्हाला हे दोन नियम माहित असणे अत्यंत गरजेचे. त्यामधील पहिला नियम म्हणजे कुठल्याही ट्रेनच्या जनरल डब्यातून प्रवास करताना प्रवासी 199 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करणार असेल तर त्याला प्रवासाच्याच दिवशी तिकीट खरेदी करावे लागेल. कारण की हे तिकीट केवळ 3 तासांसाठी पात्र आहे.
अशा परिस्थितीत तुम्हाला तीन तासांच्या आत ट्रेनमध्ये चढावे लागते. एखादा प्रवासी 200 किलोमीटर किंवा त्याहून अधिक किलोमीटर प्रवासासाठी 3 दिवसआधी ट्रेनचे टिकीट बुक करू शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.