भारत पाक सीमेवर तणाव वाढतो आहे, पाककडून युद्ध सदृश्य जमवाजमव

जम्मू काश्मीर: पुलवामा जिल्ह्यात दहशवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये युद्ध सदृश्य जमवाजमव सुरु असून, पश्चिम सीमेवरून पाकिस्तानी सैन्य कमी करून ते जम्मू-काश्मीरजवळच्या पूर्व सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग तयार झाल्याचे वातावरण आहे, एएनआयने यासंबंधी अधिकृत वृत्त दिले आहे.
पाकिस्तानचे त्यांच्या ठराविक सहकारी देशांशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे जर ताणावाच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी तसेच उद्रेकाची स्थिती निर्माण झाल्यास त्यांची तडकाफडकी मदत घेण्यात येईल, असे पाकिस्तानच्या राजकीय सुत्रांनी म्हटल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. दरम्यान, पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यानंतर काही तासांपूर्वीच जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शत्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार करण्यात आला. तसेच याला भारताकडून सडेतोड उत्तर देण्यात आले. परंतु, त्यानंतर भारताने सैन्याने जमवाजमव सुरु केल्यानंतर पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये ते म्हणाले, आम्ही स्वतःहून कुठलीही तयारी करत नाही, परंतु तुम्ही युद्धासाठी तयारी करीत असाल तर त्याला उत्तर देण्याचा अधिकार आम्हाला आहे, युद्धासंबंधीचे असे सूचक विधान देखील त्यांनी केले होते.
भारत पाकिस्तान या दोन्ही देशांतील युद्धाच्या शक्यतेबाबत गफूर म्हणाले की, या दोन्ही देशांमध्ये युद्ध व्हावे अशी आमची इच्छा नाही. भारत आम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकत नाही उलट आम्हीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतो, त्यामुळे भारताने पाकिस्तानशी वाद घालू नये, असा चिथावणीचा इशाराच गफूर यांनी भारताला दिला आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Chandramani Gemstone | तणाव आणि विसंवाद दूर करण्यासाठी परिणामकारक, चंद्रमणी रत्नाचे अनेक फायदे जाणून घ्या
-
हे भारत निर्माण? | मोदी सरकारची 2022 ते 2025 पर्यंत 6 लाख कोटीची सरकारी मालमत्ता विकण्याची योजना
-
Instant Loan App | इन्स्टंट लोन ॲपने कर्ज घेणारे अनेकजण आर्थिक विळख्यात, अनेक मार्गांनी धक्का बसतोय
-
राज्यातील मतदारांच्या मनातील सुप्त लाव्हा भाजप-शिंदेंच्या मुळावर, सर्व्हेनुसार लोकसभेत भाजपला मोठा धक्का बसणार
-
Incredible India Trip | लाँग विकेंड, तुम्ही या बजेट फ्रेंडली ठिकाणांना भेट देण्याची योजना आखू शकता
-
संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार अजुन काही दिवस केवळ शिंदे-फडणवीसांचं 'अति सूक्ष्म कॅबिनेट मंत्रिमंडळच' सांभाळणार?, कारण काय?
-
VIDEO | महागाई, बेरोजगारी मुद्दे सोडून धार्मिक मुद्यांना बळ | बिहारमध्ये गोदी मीडिया हाय-हाय, गोदी मीडिया गो-बॅक घोषणाबाजी
-
Bihar Political Crisis | बिहारमध्ये 2 दिवसांत खेला होबे?, भाजप प्रणित एनडीएमध्ये फूट पडणार, राजद भाजपशी आघाडी तोडणार?
-
Airtel 5G Network Launch | एअरटेलची 5G सेवा या महिन्यात लाँच होणार, 2024 पर्यंत संपूर्ण देशात नेटवर्क पोहोचणार
-
Yatharth Hospital IPO | यतर्थ हॉस्पिटल आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या