मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या कर्मचारी युनियनन मोदी सरकारला पत्र लिहिलं आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. सीबीआय ते न्यायालयापासून सर्वच मोदी सरकारविरोधात हस्तक्षेपाच्या नावाने बंड पुकारत आहेत. त्यात आता रिझर्व्ह बँकेच्या कर्मचारी युनियनने सुद्धा मोदी सरकारला इशारा देणारं पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी बँकांची स्वायत्तता अबाधित ठेवण्याची लेखी मागणी केली आहे. तसेच RBI च्या कामकाजात केंद्र सरकारनं ढवळाढवळ करणं थांबवावं, असं सुद्धा पत्रात नमूद केले आहे.

जर केंद्राने आरबीआयच्या कामकाजातील ही ढवळाढवळ थांबवली नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगायला सुद्धा केंद्राने तयार राहावे, असा थेट इशाराच आरबीआय कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं मोदी सरकारला दिला आहे. मोदी सरकारकडून बँकांच्या स्वायत्ततेला धोका पोहोचवला जातोय, असाही या पत्रात उल्लेख आहे. दरम्यान, स्वतः RBI चे उपगव्हर्नर विरल आचार्य यांनी सुद्धा कर्मचारी संघटनेच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. ज्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आरबीआय संघटनेच्या विधानानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सुद्धा मोदी सरकारला या विषयाला अनुसरून लक्ष्य केलं आहे.

RBI union writes Waring letter to central government for interfere in banking