30 April 2025 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

एका प्रश्नावर नक्कीच विचार करा | शांतीने चाललेल्या आंदोलनातील हिंसेचा फायदा कोणाला झाला?

Congress spokesperson, Supriya Shrinate, BJP, Tractor rally

नवी दिल्ली, २८ जानेवारी: दिल्लीत 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी, कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. सकाळी आंदोलक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला होता. यावेळी दिल्लीच्या रस्त्यांवर मोठा हिंसाचार झाला. मंगळवारी झालेल्या हिंसाचारात 200 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत.

हिंसाचाराप्रकरणी FIR दाखल करण्यात आल्या आहेत. FIR मध्ये सरकारी संपत्तीचं नुकसान, बंडखोरी, शस्त्रांत्रांचा समावेश, मारहाण असे कलम सामिल आहेत. या हिंसाचाराचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तसेच दोन्ही बाजूने अनेक दावे करणारे व्हिडिओ अजूनही समाज माध्यमांवर व्हायरल होतं आहेत. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत फोटो मध्ये झळकलेले आणि काल उपद्रव माजविणारे आंदोलक फरार असल्याचं वृत्त आहे.

दुसऱ्या बाजूला या आंदोलनात सर्वात महत्वाची राज्य ही पंजाब आणि हरियाणा आहेत. मात्र उत्तर प्रदेशातील दोन छोट्या शेतकरी संघटनांनी आंदोलनातून काढता पाय घेताच लगेचच आंदोलनात फूट पडल्याची वृत्त प्रसिद्ध झाली आहेत. त्यानंतर लगेचच आंदोलक ज्या ठिकाणी आंदोलनासाठी बसले आहेत तेथील स्थानिकांनी घोषणाबाजी करून शेतकऱ्यांना मार्ग मोकळा करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर पत्रकारांकडूनच ते भाजपचे कार्यकर्ते असल्याचं खालील व्हिडिओ मध्ये पत्रकारांच्या तोंडूनच सिद्ध होतंय.

एकूण घटनाक्रम पाहता शेतकऱ्यांचं नुकसान शेतकरी का करतील असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मात्र यासर्व घटनाक्रमात सर्वाधिक फायदा हा भाजपचा झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यालाच अनुसरून काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “झोपण्याआधी एका प्रश्नावर नक्कीच विचार करा, दूध का दुध आणि पाणी का पाणी होऊन जाईल….शांतपणे चाललेल्या शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराचा फायदा कोणाला झाला?

 

News English Summary: Looking at the overall situation, the question arises as to why the farmers will suffer. However, the BJP has benefited the most from all these developments. Accordingly, Congress spokesperson Supriya Srinath has made a suggestive statement. He tweeted, “Before going to bed, think of a question, why milk and water will become water …. Who benefited from the violence in the peaceful peasant movement?”

News English Title: Congress spokesperson Supriya Shrinate slams BJP indirectly over tractor rally incident news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या