नवी दिल्ली, २६ मे: जगाच्या तुलनेत भारतातील कोरोनाचे रुग्ण कमी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. तसंच देशाचा रिकव्हरी रेट हा वाढून आता ४१.६१ टक्क्यांवर आला आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरच्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.

देशात टप्प्यानुसार वाढवण्यात आलेल्या लॉकडाउन प्रामणेच कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. आपण योग्य प्रमाणात चाचण्या करत असून गेल्या काही दिवसांपासून देशात १ लाखांहून अधिक टेस्ट होत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आतापर्यंत देशात ६० हजार ४९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना संक्रमणाचा रिकव्हरी रेट देखील ४१.६१ टक्क्यांवर आला आहे, जो मार्चमध्ये ७.१% इतका होता. तसंच दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये हा रिव्हर रेट वाढून ११.२४ झाला. तर तिसऱ्या टप्प्यात तो वाढून २६.५९ टक्के इतका झाला. तर देशात मृत्यू दर २.३८ टक्के आहे जो आधी ३.३% होता.

 

News English Summary: According to Love Agarwal, Secretary, Ministry of Health, India has less coronary heart disease patients than the rest of the world. Also, the country’s recovery rate has risen to 41.61 per cent. This was stated at a joint press conference of the Union Ministry of Health and ICMR here today.

News English Title: India has less coronary heart disease patients than the rest of the world News Latest Updates.

राज्य सरकारला घेरणाऱ्या केंद्राची देशातील कोरोना आकडेवारीवरून जगाशी तुलना