
Home Loan Alert | सर्वच व्यक्ती आपल्या स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठी बँकांकडून गृह कर्ज किंवा वाहनांसाठी कर्ज घेतात. कर्ज फेडताना अचानक कर्जदाराचा मृत्यू झाला तर, त्याने अंगावर घेऊन ठेवलेल्या कर्जाचे काय होते. त्याचबरोबर बँक आपले उरलेले पैसे म्हणजेच कर्ज कशा पद्धतीने वसूलते. हे आणि असे बरेच प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाले असतील. आज आम्ही या सर्व प्रश्नांचे निरासन करणार आहोत आणि गृह कर्जाच्या परतफेडीबद्दल काही महत्त्वाची माहिती देखील सांगणार आहोत.
को अप्लिकंटशी संपर्क :
ज्यावेळी बँकेला समजते की, आपल्या कर्ज घेतलेल्या ग्राहकाचा अचानक मृत्यू झाला आहे तर, बँक सर्वप्रथम मृत कर्जदाराच्या को अप्लिकंटशी संपर्क साधते. अशा परिस्थितीत को अप्लिकंटने बँकेची कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवला नाही तर, बँक लोन गॅरेंटर व्यक्तीला संपर्क करते. कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही तर, थेट मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना संपर्क साधावा लागतो.
बँक कायद्याने चालते :
काही परिस्थितीमध्ये असंही पाहायला मिळतं की, कुटुंबीयांना संपर्क साधून देखील बँकांना त्यांचे पैसे भरून मिळत नाहीत. व्यक्तिमत पावणे हा निसर्गाचा नियम आहे. यामध्ये बँकेची कोणत्याही प्रकारची फसवणूक होता कामा नये. बँक आणि कुटुंबीयांबरोबर चर्चा करून प्रश्न सुटला नाही तर, बँकांना कायदेशीर प्रक्रिया सुरू करून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून कर्जाची वसुली करावी लागते.
संपत्ती देखील जप्त केली जाते :
तसं पाहायला गेलं तर शिस्तीत बँकेचे लोन फेडणे फायद्याचे ठरू शकते. समजा एखाद्या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी लोन फेडण्यास नकारात्मकता दर्शवली तर, बँकांकडून मृत व्यक्तीची संपत्ती थेट जप्त करण्यात येते. बँका केवळ संपत्ती जप्त करत नाही तर, जप्त केलेल्या मालमत्तेची नीलामी देखील करतात आणि या माध्यमातून ते त्यांचे पैसे वसूलतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.