3 May 2025 11:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

सेना-भाजप एकत्र येण्याच्या राजकीय पुड्या | राणेंना मंत्रिमंडळात स्थान हे सेना-भाजप ४ वर्ष तरी एकत्र येणार नसल्याचे संकेत? - सविस्तर वृत्त

Mahavikas Aghadi

मुंबई, ०६ जुलै | मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची जेवढी चर्चा महाराष्ट्रात आहे त्यापेक्षा जास्त चर्चा ठाकरे सरकारच्या अस्तित्वाची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला टाळलेल्या पत्रकार परिषदेमुळे तर चर्चेला आणखीनच उधान आलंय

एकाबाजूला जे बिहारमध्ये महागठबंधनचं झालं तेच महाराष्ट्रात महाआघाडीचं होणार अशी वृत्त पसरवली जातं आहेत. म्हणजे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच असतील. भाजपाला दोन उपमुख्यमंत्रीपद दिले जातील. फडणवीसांना केंद्रात पाठवलं जाईल अशा फॉर्म्युल्याची चर्चा गेल्या काही दिवसात जोरदार आहे. खुद्द फडणवीसांनी मात्र मी केंद्रात जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यानंतरही ही चर्चा काही थांबलेली नाही. मोदी सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार आहे. त्यातही सेनेला स्थान दिलं जाईल असं वृत्त देखील प्रसिद्ध झालंय. त्यापार्श्वभूमीवर तर महाराष्ट्रात सत्तेचा नवा डाव खेळला जातोय असं चित्र माध्यम रंगवताना दिसत आहेत.

एक तर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही आघाडीच ‘अनैसर्गिक’ असल्याचा दावा, आरोप भाजपा करतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही कुठल्याही क्षण सत्ता बदलाचा ‘बिहारी पॅटर्न’ अस्तित्वात येईल अशी चर्चा सुरु झाली आहे. या पॅटर्ननुसार जसे नितीशकुमार लालू यादव यांना सोडून भाजपसोबत आले तसेच उद्धव ठाकरे हे शरद पवारांना सोडून भाजपसोबत येतील अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपूर्वी सोडण्यात येणाऱ्या राजकीय पुड्या एवढंच त्याला समजावं लागेल. एवढं सगळं होतं असेल आणि त्यासाठी कल्पना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि कॉग्रेस पक्षातील श्रेष्ठीना नसेल असं समजणं म्हणजे राजकारण कळत नाही एवढंच म्हणावं लागेल. कारण, बिहार मध्ये जे घडलं ते आधीच ठरलं होतं आणि त्यामुळे त्याचा संदर्भ महाराष्ट्रात जोडणं म्हणजे कहर म्हणावा लागेल. त्यात भाजप हा किती घातक योजना आखणारा पक्ष आहे ते उद्धव ठाकरेंना समजलं आणि त्यावेळीच त्यांनी काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यात नारायण राणेंना मंत्रिमंडळात स्थान म्हणजे भाजप शिवसेनेसोबत किंवा शिवसेना भाजपसोबत किमान पुढील ४ वर्ष एकत्र येणार नाहीत याचे संकेत म्हणावे लागतील.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena and BJP alliance for next 4 years is impossible said political experts news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या