
मुंबई, 26 नोव्हेंबर | क्रिप्टोकरन्सीबाबत भारतात वाद सुरू आहे. यावर केंद्र सरकार देखील लगाम घालण्याच्या तयारीत आहे. असं असलं तरी या सर्व अनुमानांना न जुमानता, भारतातील क्रिप्टो मार्केट सतत वाढत आहे. विशेषत: तरुणांमध्ये या डिजिटल चलनाबाबत प्रचंड (Cryptocurrency Investment) उत्साह आहे.
Cryptocurrency Investment. Vijay Shekhar Sharma, founder of Paytm, a digital payment app says that cryptocurrencies will become a part of our lives in the next 5-7 years :
मात्र आता क्रिप्टोकरन्सीच्या समर्थनार्थ, पेटीएम या डिजिटल पेमेंट अॅपचे संस्थापक विजय शेखर शर्मा देखील पुढे आले आहेत. विजय शेखर म्हणतात की क्रिप्टोकरन्सी येत्या ५-७ वर्षांत आपल्या जीवनाचा एक भाग बनतील.
विजय शेखर शर्मा यांनी काय सांगितले?
फिनटेक कंपनी पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी आयसीसी (इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स) च्या एका कार्यक्रमात सांगितले की क्रिप्टोकरन्सी प्रत्यक्षात क्रिप्टोग्राफीवर आधारित आहे. क्रिप्टोग्राफी या डिजिटल चलनाची सुरक्षा प्रदान करते. पुढे ते म्हणाले की, येत्या काही वर्षांत क्रिप्टोकरन्सीही इंटरनेटप्रमाणे लोकांच्या जीवनाचा एक भाग बनतील.
क्रिप्टोचे अस्तित्व संपणार नाही :
क्रिप्टोच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर विजय शेखर शर्मा म्हणाले की, क्रिप्टोकरन्सीचे अस्तित्व संपणार नाही. ते कुठेही जात नाही, पण हळूहळू लोकांच्या जीवनाचा एक भाग होईल. भारत सरकार अजूनही क्रिप्टोबाबत साशंक आहे, मात्र येत्या 5 वर्षांत हे चलन मुख्य प्रवाहातील तंत्रज्ञान असेल.
क्रिप्टोकरन्सी कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी भारतात विधेयक आणण्याची तयारी सुरू आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही क्रिप्टोच्या गैरवापराची भीती व्यक्त केली आहे. याबाबत पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा म्हणाले की, सध्या या डिजिटल चलनाबाबत संभ्रम आहे. भारतच नाही तर जगातील प्रत्येक सरकार याबाबत साशंक आहे. पण येत्या पाच वर्षांत ते मुख्य प्रवाहातील तंत्रज्ञान बनेल. प्रचलित चलनाच्या जागी क्रिप्टो वापरण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की नाही, क्रिप्टो कधीही सध्याच्या चलनाची जागा घेऊ शकत नाही.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.