
Post Office Scheme | आजच्या काळात आरोग्यविम्याचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे, अनिश्चिततेच्या काळात वाईट काळासाठी आधीच तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य विमा पॉलिसीचा प्रीमियम वयानुसार कमी जास्त असतो. महागडा विमा घेतला तर त्याचा हप्ताही महागला. यामुळे अनेक वेळा लोक आरोग्य विमा घेण्यास कचरतात. ही बाब लक्षात घेऊन इंडिया पोस्टतर्फे सामूहिक विमा संरक्षण योजना देण्यात येते, जिथे तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाते, ज्यात तुम्हाला २९९ रुपये आणि ३९९ रुपये इतक्या कमी प्रीमियमसह १० लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाते.
काय आहे नेमकी योजना :
इंडिया पोस्ट आणि टाटा एआयजी यांच्यात झालेल्या करारानुसार ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, 18 वर्षांपासून ते 65 वर्षांपर्यंतचे लोक सामूहिक अपघातात विमा लाभ घेऊ शकतात. या विमा संरक्षणांतर्गत अपघाताने मृत्यू, कायमचे किंवा अंशत: पूर्ण अपंगत्व, अर्धांगवायूग्रस्त यांना १० लाख रुपयांचे संरक्षण मिळणार आहे. या विम्याचे 1 वर्षानंतर नूतनीकरण करावे लागेल. त्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत एखाद्या व्यक्तीचे खाते असणे आवश्यक आहे.
हॉस्पिटलचा खर्च कसा मिळेल :
या विम्यामध्ये एखाद्या व्यक्तीला उपचारासाठी ६० हजार रुपये आणि आयपीडी आणि ओपीडीमध्ये ३० हजार रुपये कोणत्याही अपघातामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यास दिले जातात.
इतरही अनेक फायदे :
या विम्याअंतर्गत ३९९ रुपयांच्या प्रीमियम विम्यामुळे २ मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च, १० दिवस हॉस्पिटलमधील रोजचा १००० दैनंदिन खर्च, दुसऱ्या शहरात राहणाऱ्या कुटुंबासाठी २५ हजार रुपयांपर्यंत वाहतूक खर्च आणि मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी पाच हजार रुपयांपर्यंतचा वाहतूक खर्च असे आणखी काही फायदेही मिळणार आहेत. या विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.