पुणे, ४ नोव्हेंबर: Republic TV’चे संपादक आणि विवादित पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “अर्णव आमचा पोपट नाही, आम्ही पोपट वगैरे पळत नाही, पोपट तेच पाळतात”, असा टोला आमदार चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
एवढ्या मोठ्या टेलिव्हिजन वृत्त वाहिनीच्या संपादकाला तुम्ही असे फरपटत नेता, तो विनंती करतो, माझ्या आईला औषधं देऊ द्या, मग आपण निघूया. पण ते एकलं जात नाही. या गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे.
“अर्णब यांनी विरोधात बोलल्यामुळे ठाकरे सरकार कुठलीतरी संधी शोधत होतं. त्यातूनच ही सूडबुद्धीने कारवाई झाली. या प्रकरणासाठी आंदोलन, निषेध व्यक्त करणार. पत्रकार, महिला किंवा ज्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंबीय असूद्या, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात सगळ्यांनी उतरलं पाहिजे. यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही”, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
News English Summary: BJP’s Maharashtra state president Chandrakant Patil has criticized the Thackeray government over the arrest of Republic TV editor and controversial journalist Arnab Goswami. Arnav Goswami is not our parrot, we do not keep parrots etc., they keep parrots, ”said Tola MLA Chandrakant Patil.
News English Title: Chandrakant Patil has criticized the Thackeray government over the arrest of Republic TV editor Arnab Goswami News updates.
