19 April 2024 12:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

आदित्य ठाकरेंकडून माहुलवासीयांसाठी गोराई येथील घरांच्या चाव्यांचे वितरण

Mahul Pollution

मुंबई: तेल आणि रासायनिक कंपन्यांचा शेजार लाभलेल्या माहुलवासीयांचे जगणे अस्वच्छता, गैरसोयी आणि मुख्य म्हणजे प्रदूषित हवेमुळे असह्य़ बनले आहे. एकमेकांना खेटून असलेल्या येथील इमारतींत दिवसाही सूर्यप्रकाशाला थारा नसतो. त्यामुळे श्वसनाच्या आणि त्वचेच्या विकारांनी हे रहिवाशी ग्रासले आहेत. आयआयटी, केईएम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींनी केलेल्या विविध पाहणीत वारंवार माहुलमधील प्रदूषणावर बोट ठेवण्यात आले होते. आजही माहुलवासीयांचा प्रश्न न्यायालयाच्या दरबारात अधूनमधून उठत असतो; परंतु पालिका, युती सरकार अशा सर्वच यंत्रणा त्यांच्या समस्यांवर तातडीने उपाय योजण्याऐवजी कागदी घोडे नाचविण्यातच दंग होते.

मुंबईत विविध विकास प्रकल्पांमध्ये घर गमावणाऱ्या कुटुंबांसाठी ‘एमएमआरडीए’ने माहुल गावात ७२ इमारती बांधल्या आहेत. सध्या येथील संकु लांमध्ये सुमारे ६ हजार प्रकल्पबाधित कुटुंबे वास्तव्यास आहेत. यामध्ये विद्याविहार येथील १,२००, तानसा पाइपलाइन सायकल ट्रॅक प्रकल्पातील १०००, वांद्रे येथील ४५० आणि उर्वरित कु टुंबे घाटकोपर, कुर्ला, पवई या भागांतील आहेत. मात्र इथल्या प्रदूषणामुळे त्रस्त झालेले इथले रहिवासी पुन्हा एकदा विस्थापित होण्याच्या मार्गावर आहेत. आम्हाला या नरकात राहायचे नाही, आम्हाला इतरत्र घरे द्या, अशी या रहिवाशांची मागणी आहे.

दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून जीवघेण्या प्रदूषणात राहणाऱ्या २०० हून अधिक माहुलवासीयांची अखेर मृत्यूच्या दाढेतून सुटका झाली आहे. माहुलवासीयांसाठी गोराई येथे बांधण्यात आलेल्या घरांचे ताबापत्र व चाव्यांचे वितरण काल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘मातोश्री’ निवासस्थानी हे चावीवाटप पार पडले.

तानसा जलवाहिनीवरील झोपडपट्ट्या हटवण्याचे काम पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. आतापर्यंत यापैकी सुमारे ५००० जणांचे माहुलमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र चेंबूर, ट्रॉम्बे परिसरातील विविध रिफायनरी प्रकल्पांमुळे हा परिसर राहण्यास धोकादायक ठरला आहे. प्रदूषणामुळे माहुल प्रकल्पग्रस्तांना टीबी, अस्थमा या श्वसनाच्या आजारांबरोबरच त्वचा विकार, कॅन्सरसारखे जीवघेणे आजार झाल्याचे समोर आले आहे. प्रदूषणामुळेच शेकडो रहिवाशांचा मृत्य झाल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांनी न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या अहवालानुसार न्यायालयाने प्रकल्पग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी घरे द्यावीत किंवा त्यांना इतर ठिकाणी राहण्यासाठी दरमहा १५ हजार रुपये घरभाडे द्यावे, असे आदेश पालिकेला दिले आहेत. मात्र पालिकेने ते आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या पाठपुराव्यातून ‘म्हाडा’तर्फे प्रकल्पग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून २०६ घरांचे वितरण करण्यात येत असून आज आदित्य यांनी १० जणांना घराच्या चाव्या सोपवल्या. उद्या उर्वरित चाव्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

 

News English Summery: Over the past several years, more than 200 inhabitants of the deadly pollution have finally been rescued from the shadow of death. The distribution of keys and keys of the houses built at Gorai for Mahul residents was delivered by Environment Minister Aditya Thackeray yesterday. The key was passed at ‘Matoshree’ residence. The administration of the municipality is in the process of removing the slums on the Tansa waterway. So far, about 5,000 of them have been rehabilitated in the city. However, due to various refinery projects in the area of ​​Chembur, Trombay, the area is in danger. Due to the pollution, mahul project sufferers have been exposed to life-threatening diseases like TB, asthma, respiratory diseases as well as skin disorders and cancer. Project workers are blaming hundreds of residents for the deaths due to pollution.

 

Web News Title: Story Mahul Pollution affected residence got new home Key from MahaVikas Aghadi Government.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x