अजब | स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलनं आणि मतदान करणाऱ्या फडणवीसांचा अखंड भारत'चा नारा

नागपूर, २१ नोव्हेंबर: महाराष्ट्रात सध्या कराची स्वीट्सवरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या एका नेत्याने मिठाईच्या दुकानातील मालकाला दुकानाचे नाव पाकिस्तानी शहर असल्याने त्या नावातून ‘कराची’ हा शब्द काढून टाकण्यास सांगितले, यासंदर्भात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले तेव्हा ते म्हणाले की, ‘अखंड भारत’ वर आमचा विश्वास आहे. मुंबईत सदर घटना घडल्यानंतर फडणवीस यांनी पीटीआयशी बोलताना हे वक्तव्य केले.
फडणवीस पुढे म्हणाले की, एक दिवस कराची हा भारताचा भाग असेल. ‘अखंड भारत’ (अविभाजित भारत) यावर आमचा विश्वास आहे आणि एक दिवस कराची भारताचा भाग होईल असा आमचा विश्वास आहे. गुरुवारी, शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी वांद्रे येथील प्रतिष्ठित कराची मिठाईच्या मालकाला दुकानाचे नाव बदलून भारतीय किंवा मराठी नाव देण्याचे आदेश दिले. मात्र, या घटनेनंतर शिवसेनेच्या संजय राऊत यांनी ही पक्षाची “अधिकृत भूमिका” नसल्याचे स्पष्ट केले. राऊत म्हणाले, “कराची स्वीट्स आणि कराची बेकरी मुंबईत ६० वर्षांपासून आहेत. त्यांचा पाकिस्तानशी काही संबंध नाही. आता त्यांचे नाव बदलण्यात अर्थ नाही … ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही.”
वास्तविक २०१४ मध्ये सत्ता आल्यावर बेळगाव प्रश्नावर म्हणजे अखंड महाराष्ट्रासाठी ताकदीने आणि आक्रमकपणे पुढे येताना कधी दिसलेच नाही. कर्नाटकात भाजपाची सत्ता असल्याने त्यांनी तशी हिम्मत देखील केली नसती. दुसरीकडे सत्तेत येण्यापूर्वी म्हणजे डिसेंबर २०१३ मध्ये नागपुरात तब्बल ६०० ठिकाणी बूथ लावून स्वतंत्र विदर्भासाठी मतदान घेण्यात आले होते आणि त्यात देवेंद्र फडणवीस सर्वात पुढे होते तसेच त्यांनी स्वतः ट्विट करून विदर्भातील लोकांना या संदर्भात मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. महाराष्ट्र अखंड रहावा म्हणून प्रयन्त न करणारे आणि मराठी मातीचे दोन तुकडे करण्यासाठी पुढाकार घेणारे फडणवीस आज अखंड भारतावर बोलत आहेत हे हास्यास्पद म्हणावे लागेल.
काय होतं ते फडणवीसांचं नेमकं ट्विट;
I voted for Separate #Vidarbha,DID YOU?
Voting available at more than 600 public places at #Nagpur.
Vote NOW ! pic.twitter.com/E2u8lGpZOx— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 16, 2013
News English Summary: In Maharashtra, politics is hot from Karachi Sweets. A Shiv Sena leader asked the owner of a sweet shop to remove the word ‘Karachi’ from the name of the shop as it is a Pakistani city. Asked about this, former Maharashtra Chief Minister and BJP leader Devendra Fadnavis said, “We believe in a united India.” Fadnavis made this statement while talking to PTI after the incident in Mumbai.
News English Title: Devendra Fadnavis talked about undivided India News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Chandramani Gemstone | तणाव आणि विसंवाद दूर करण्यासाठी परिणामकारक, चंद्रमणी रत्नाचे अनेक फायदे जाणून घ्या
-
हे भारत निर्माण? | मोदी सरकारची 2022 ते 2025 पर्यंत 6 लाख कोटीची सरकारी मालमत्ता विकण्याची योजना
-
राज्यातील मतदारांच्या मनातील सुप्त लाव्हा भाजप-शिंदेंच्या मुळावर, सर्व्हेनुसार लोकसभेत भाजपला मोठा धक्का बसणार
-
VIDEO | महागाई, बेरोजगारी मुद्दे सोडून धार्मिक मुद्यांना बळ | बिहारमध्ये गोदी मीडिया हाय-हाय, गोदी मीडिया गो-बॅक घोषणाबाजी
-
Incredible India Trip | लाँग विकेंड, तुम्ही या बजेट फ्रेंडली ठिकाणांना भेट देण्याची योजना आखू शकता
-
Yatharth Hospital IPO | यतर्थ हॉस्पिटल आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या
-
Airtel 5G Network Launch | एअरटेलची 5G सेवा या महिन्यात लाँच होणार, 2024 पर्यंत संपूर्ण देशात नेटवर्क पोहोचणार
-
Bihar Political Crisis | बिहारमध्ये 2 दिवसांत खेला होबे?, भाजप प्रणित एनडीएमध्ये फूट पडणार, राजद भाजपशी आघाडी तोडणार?
-
EPFO Money | ईडीएलआय योजनेत ईपीएफ खातेधारकांना मिळणार 7 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती
-
Stocks in Focus | धमाकेदार रिटर्न्स, 5 दिवसात 67 टक्के परतावा, गुंतवणूकदारांना मजबूत फायदा, हे स्टॉक्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी