30 May 2023 2:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Calculator | PPF कॅल्क्युलेटर सांगेल 1000 गुंतवून 18 लाख परतावा कसा मिळवायचा, पैसा वाढवणारी माहिती  Loan Recovery Rules | आता तुमचे बॅंकेचे EMI थकले तरी डोन्टवरी, कर्जदाराला आरबीआयने दिलेले महत्वाचे अधिकार लक्षात ठेवा Investment Tips | या सरकारी योजनेत दररोज 45 रुपये गुंतवल्यास 25 लाख रुपये परतावा मिळेल, अधिक जाणून घ्या Multiple Bank Accounts | बँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट्स असतील तर आधी ही खबरदारी घ्या, अन्यथा... Plan 475 | ममता-नितीश यांचा प्लॅन 475 काय आहे? 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने 52 जागा जिंकल्या होत्या तर 209 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते Triveni Engineering Share Price | मागील 5 दिवसात त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स तेजीत, नेमके कारण काय? Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर स्टर्लिंग टूल्स शेअरचा गुंतवणूकदारांना 105% परतावा, आता 100% डिव्हीडंड देणार, स्टॉक डिटेल्स पहा
x

निवडणूक प्रक्रियेत बदल, ईव्हीएम मशीन हद्दपार होणार ?

नवी दिल्ली : देशातील निवडणूक प्रक्रियेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण भारतातील लोकशाही अबाधित ठेवण्याचे मोठे काम निवडणूक प्रक्रिया निभावत असते. त्याचाच भाग म्हणून देशातील निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम मशीन हद्दपार होऊ शकतात.

भारतात पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे मतदान घेतले जाण्याची चिन्हं दिसत आहेत. २०१४ पासूनचा निकालानंतर आणि विविध पक्षांच्या आरोपानंतर भाजपने यावर गांभीर्याने विचार सुरु केला आहे. परंतु सर्वच पक्षांचं एकमत झाल्यास निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम मशिन हद्दपार करण्याची तयारी असल्याचे भाजपच्या गोटातून समजत आहे.

ईव्हीएम मशीन संबंधित विविध आरोपानंतर काँग्रेसने भविष्यातील निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर करावा अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती. परंतु आता विविध आरोपानंतर भाजपने सुद्धा यांच्या भूमिकेत बदल केला आहे. ए.एन.आयशी बोलताना भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी प्रतिक्रिया दिली की जर विविध पक्षांना वाटत असेल तर आम्हाला परत मतपत्रिकेकडे वळण्यास काहीच अडचण किंव्हा हरकत नाही, केवळ सर्व बाजूंचा विचार करून चर्चा होण्याची गरज आहे. कारण निवडणूक प्रक्रिया ईव्हीएम मशीनकडे वळवण्याचा निर्णय हा सर्वसहमतीने त्यावेळी घेण्यात आला होता, हे फक्त काँग्रेसने विसरू नये असं स्पष्टीकरण सुद्धा भाजपच्या राम माधव यांनी ए.एन.आयशी बोलताना दिल.

२०१४ नंतरच्या विविध निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून निवडणुका जिंकल्या जात आहेत असे आरोप विविध पक्षांकडून केले गेले. त्या आरोपांनी जास्त जोर धरला तो उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या डोळे दिपवून टाकणाऱ्या यशाने. त्यानंतर काँग्रेस आणि विविध राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे हरकती दर्शविल्या होत्या. सध्या नवी दिल्लीत काँग्रेस पक्षाचं अधिवेशन सुरु आहे आणि तिथे तशा आशयाचा ठराव सुद्धा काँग्रेसने मंजूर केला आहे. त्यानंतर पुन्हा भारतातील निवडणूक प्रक्रिया मतपत्रीकेकडे वळवण्याचा विषयाने जोर धरला आहे.

हॅशटॅग्स

#EVM Machine(3)#Narendra Modi(1663)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x