निवडणूक प्रक्रियेत बदल, ईव्हीएम मशीन हद्दपार होणार ?

नवी दिल्ली : देशातील निवडणूक प्रक्रियेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण भारतातील लोकशाही अबाधित ठेवण्याचे मोठे काम निवडणूक प्रक्रिया निभावत असते. त्याचाच भाग म्हणून देशातील निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम मशीन हद्दपार होऊ शकतात.
भारतात पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे मतदान घेतले जाण्याची चिन्हं दिसत आहेत. २०१४ पासूनचा निकालानंतर आणि विविध पक्षांच्या आरोपानंतर भाजपने यावर गांभीर्याने विचार सुरु केला आहे. परंतु सर्वच पक्षांचं एकमत झाल्यास निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम मशिन हद्दपार करण्याची तयारी असल्याचे भाजपच्या गोटातून समजत आहे.
ईव्हीएम मशीन संबंधित विविध आरोपानंतर काँग्रेसने भविष्यातील निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर करावा अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती. परंतु आता विविध आरोपानंतर भाजपने सुद्धा यांच्या भूमिकेत बदल केला आहे. ए.एन.आयशी बोलताना भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी प्रतिक्रिया दिली की जर विविध पक्षांना वाटत असेल तर आम्हाला परत मतपत्रिकेकडे वळण्यास काहीच अडचण किंव्हा हरकत नाही, केवळ सर्व बाजूंचा विचार करून चर्चा होण्याची गरज आहे. कारण निवडणूक प्रक्रिया ईव्हीएम मशीनकडे वळवण्याचा निर्णय हा सर्वसहमतीने त्यावेळी घेण्यात आला होता, हे फक्त काँग्रेसने विसरू नये असं स्पष्टीकरण सुद्धा भाजपच्या राम माधव यांनी ए.एन.आयशी बोलताना दिल.
२०१४ नंतरच्या विविध निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून निवडणुका जिंकल्या जात आहेत असे आरोप विविध पक्षांकडून केले गेले. त्या आरोपांनी जास्त जोर धरला तो उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या डोळे दिपवून टाकणाऱ्या यशाने. त्यानंतर काँग्रेस आणि विविध राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे हरकती दर्शविल्या होत्या. सध्या नवी दिल्लीत काँग्रेस पक्षाचं अधिवेशन सुरु आहे आणि तिथे तशा आशयाचा ठराव सुद्धा काँग्रेसने मंजूर केला आहे. त्यानंतर पुन्हा भारतातील निवडणूक प्रक्रिया मतपत्रीकेकडे वळवण्याचा विषयाने जोर धरला आहे.
I would like to remind Congress that the decision to shift from paper ballots to EVMs was taken because of a larger consensus. Now today, if every party think that we should return to paper ballots again, after due discussion, we can consider: Ram Madhav, BJP General Secretary pic.twitter.com/nqzf2zVOWQ
— ANI (@ANI) March 17, 2018
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Agnipath Protests | जवानांचा अपमान सुरु | भाजपच्या कार्यालयांना वॉचमन हवा असल्यास अग्निविरांना प्राधान्य देऊ
-
Advance Tax | तुम्ही ऍडव्हान्स टॅक्सच्या पहिला हप्ता भरला का? | ही तारीख चुकल्यास महागात पडेल
-
Swathi Sathish Surgery | या अभिनेत्रीला प्लास्टिक सर्जरी भोवली | फेमच्या नादात सुंदर चेहरा कुरूप झाला
-
Road Rage Video | कपल स्कुटीसकट खाली पडलं | त्यानंतर महिलेचं नाटक पहा | पुरुष नेटिझन्स का संतापले?
-
TDS New Rules | भेटवस्तूंवर सुद्धा 10 टक्के टीडीएस | 1 जुलैपासून लागू होणारे हे नवे नियम लक्षात ठेवा
-
Business Idea | गुंतवणूक न करता हा व्यवसाय सुरु करा | महिन्याला 50,000 रुपयांची कमाई
-
Multibagger Penny Stocks | या २ रुपयाच्या शेअर गुंतवणूकदारांचं आयुष्य सार्थकी लागलं | 1 लाखाचे 2.5 कोटी झाले
-
Gold ETF Investment | हा गोल्ड फंड 64 टक्के परतावा देत संपत्ती वेगाने वाढवतोय | तुम्ही गुंतवणूक केली आहे का?
-
Mangal Rashi Parivartan | 27 जूनला मंगळ मेष राशीत प्रवेश करेल | १२ राशींवर काय परिणाम होईल जाणून घ्या
-
Agneepath Scheme | सीमेवर देशासाठी सेवा बजावणं सुद्धा कंत्राटी नोकरीचा प्रयोग? | देशभर मोदी सरकारविरोधात रोष