भूरूच : काँग्रेस तसेच डाव्या पक्षांनी देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या तसेच एकूणच वाढलेल्या महागाईविरोधात आज भारत बंद पुकारला आहे. आज सकाळ पासूनच प्रतिक्रिया उमटू लागल्या असून अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक तसेच बसेस अडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. जवळपास देशभरातील एकूण ३१ पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा दिला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात मधूनच तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
गुजरातमधील भूरूच मध्ये आंदोलक रस्त्यावर उतरले असून त्यांने हिंसक प्रकारे आंदोलनास सुरुवात केली आहे. रस्त्यावर टायर्स जाळून संपूर्ण महामार्ग अडविण्यात आले आहेत. सध्या ही सुरुवात असली तरी जस जशी वेळ पुढे सरकेल तशी आंदोलनाची तीव्रता अजूनच दाहक होत जाईल असं वृत्त आहे.
#BharathBandh: Protesters in Gujarat’s Bharuch burn tyres and stop buses; traffic movement halted pic.twitter.com/G6b9OFNXg5
— ANI (@ANI) September 10, 2018
