नवी दिल्ली : सध्या केंद्रातील मोदी सरकारची उलटी गिनती सुरु झाली आहे. RBI गव्हर्नर उर्जित पटेलांचा राजीनामा यांचा राजीनामाहाच संदेश देऊन जातो अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली आहे.
दरम्यान, नुकतीच लंडन येथे वास्तव्यास असलेल्या विजय मल्ल्या याच्या भारतातील प्रत्यार्पणाची बातमी आली आहे. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘विजय मल्ल्या भारतात असतानाही पैसे देण्यास तयार होता मग त्याच्यावर पळून जाण्याची वेळ का आली? तसेच पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख फरार आरोपी नीरव मोदीबाबत मोदी सरकार मिठाची गुळणी का धरून आहे ? असा प्रश्न सुद्धा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उपस्थित केला.
RBI गव्हर्नर उर्जित पटेल राजीनामा केंद्र सरकारच्या दबावामुळे कधीही राजीनामा देतील अशी शक्यता अनेक दिवसांपासून रंगली होती. १९ नोव्हेंबरला केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि RBI झालेल्या बैठकीनंतर सर्वकाही सुरळीत झाले असल्याचे वृत्त पसरले होते. परंतु, आज अचानक उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
