नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात बदल केले असून त्यात स्मृती इराणींना माहिती-प्रसारण मंत्रीपदावरुन हटवलं आहे. माहिती-प्रसारण मंत्रालयाचा कारभार आता राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
राज्यवर्धन सिंह राठोड हे यांच्याकडे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रिपदा बरोबरच केंद्रीय क्रीडा मंत्रिपदाची सुद्धा जवाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. परंतु स्मृती इराणींना माहिती-प्रसारण मंत्रीपदावरुन का हटवलं याच कारण समजू शकलेलं नाही. परंतु त्यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालयाची जवाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.
तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानं रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यावर अर्थमंत्रिपदाची अतिरिक्त धुरा सोपवण्यात आली आहे. तसेच एस.एस.अहलुवालिया यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला असून त्यांच्याकडील पेयजल व स्वच्छता मंत्रालयाचा कार्यभार काढूनघेण्यात आला आहे.
