2 May 2025 6:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

गडकरींकडून विजय मल्ल्याची पाठराखण, म्हणाले 'तो घोटाळेबाज कसा'?

मुंबई : विजय मल्ल्याचे लंडनमधून भारतात प्रत्यार्पण होण्याआधीच त्याला सज्जन असल्याचा दाखल देण्यास भाजपकडून सुरुवात. कारण खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीच बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून आणि देशातून पलायन कडून लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या मल्ल्याची पाठराखण केली आहे.

मुंबईतल्या एका कार्यक्रमात त्यांनी संबंधित विषयाला अनुसरून हे वक्तव्य केलं आहे. प्रत्येक धंद्यात जोखीम ही असतेच. मग ते बँकिंग क्षेत्र असो किंवा कोणताही व्यवसाय चढ-उतार हे निश्चित येणार. मात्र झालेल्या चुका जर प्रामाणिक असतील, तर त्या मोठ्या मनाने माफ करून संबंधित व्यक्तीला दुसरी संधी द्यायला हवी, असं गडकरी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.

राज्य सरकारच्या सिकॉम या कंपनीनं सुद्धा विजय मल्याला कर्ज दिलं होतं. त्यानं ते ४० वर्षांपर्यंत व्याजसकट पैसे भरले. परंतु, दुर्दैवाने एव्हिएशन व्यवसायात आलेल्या घसरणीनंतर विजय मल्याला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला होता. आणि त्यामुळेच त्याला कर्ज चुकवने शक्य झाले नाही. त्याने चाळीस वर्षे व्याजासकट पैसे परत केले, मात्र त्याला काही हफ्ते आर्थिक अडचणींमुळे फेडता न आल्यानं थेट घोटाळेबाज कसं ठरवता येईल, असा प्रश्न उपस्थित केला.

विजय माल्या असो किंवा नीरव मोदी जर या लोकांनी खरोखर घोटाळे केले असतील तर त्यांना नक्कीच तुरुंगात पाठवायलाच हवे. परंतु एखाद्या आर्थिक संकटात अडकलेल्या व्यक्तीला आपण थेट घोटाळेबाज घोषित करणं कितपत योग्य आहे. त्यामुळे अशा विचाराने भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती होणार नाही, असं सुद्धा नितीन गडकरींनी बोलताना स्पष्ट केलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या