2 May 2025 5:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

गुजरातमधून यूपी-बिहारींचे मिळेल त्या गाडीने पलायन, पोलिसांचा फ्लॅग मार्च

अहमदाबाद : बलात्काराच्या घटनेनंतर गुजरातमधील वातावरण यूपी-बिहारींच्या विरोधात प्रचंड तापले असून उत्तर भारतीय आणि बिहारच्या कामगारांनी मिळेल त्या गाडीने पळ काढण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडून सुद्धा सध्या अनेक ठिकाणी फ्लॅगमार्च करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातचे डीजीपी शिवानंद झा यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे हल्ला झाल्याने आतापर्यंत एकूण ४२ गुन्हे दाखल झाले असून ३४२ जणांना अटक करण्यात आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, हिंसेच्या भीतीने परराज्यांतून विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या कामगारांनी गुजरातच्या अनेक भागातून पलायन करण्यास सुरुवात केली आहे.

बुधवारपासूनच गुजरातच्या गांधीनगर, मेहसाणा, पाटन, साबरकाठा ते अगदी अहमदाबाद या पाच जिल्ह्यांमध्ये यूपी तसेच बिहारींविरोधात हिंसक आंदोलनांनी पेट घेण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अत्यंत चिघळलेल्या आणि हिंसक झालेल्या परिस्थितीमुळे गुजरातमधील अनेक उत्तर भारतीय आणि बिहारच्या कामगारांनी मिळेल त्या गाडीने पळ काढला आहे. मेहसाणा आणि साबरकाठा या दोन जिल्ह्यांमध्ये परिणाम सर्वाधिक तीव्र दिसत होते, तर अहमदाबाद येथून आतापर्यंत ७३ आणि गांधीनगर येथून २७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. समाज माध्यमांवर चिथावणीखोर पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी सुद्धा ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

परप्रांतीय ज्या भागात मोठ्या संख्येने कामगार रहातात तिथे पोलिसांच्या विशेष गस्त वाढवल्या असून परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन गुजरात पोलिसांना सतर्कतेचा आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. रविवारी वघोडिया इंडस्ट्रियल परिसरात २ कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीयांवर कोटांबी आणि कामरोल गावातील १७ जणांनी हल्ला केला, तसंच न्यू रानिप परिसरातही हल्ला झाल्याची माहिती आहे. चिमुकलीवरील बलात्कार प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात रविंद्र साहू या आरोपीला अटक केली. रविंद्र साहू हा मूळचा बिहारचा आहे हे समोर येताच, त्याच्या अटकेनंतर गुजरातमध्ये उत्तर भारतीय आणि बिहारच्या कामगारांवर हिंसक हल्ले होण्यास सुरुवात झाली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या