
Investment Tips | कोरोना महामारीनंतर अनेकांच्या आयूष्या मोठे चढ उतार आले. यातून आता अनेक व्यक्ती सावरत आहेत. मात्र बाजारात सद्य स्थितीत रुपया घसत चालला आहे. तर रेपो दरात देखील वाढ होत आहे. आर्थिक बाबींमध्ये मार्कैटमध्ये कायम चढउतार सुरु आहेत. त्यामुळे सर्वच चिंतेत आहेत. अशात बाजारातील या चढउताराचा परिणाम आपल्या गुंतवणूकीवर होऊ नये असे प्रत्येकाला वाटते.
तुम्हाला देखील असे वाटत असेल तर पोस्टाची ही खास स्कीम फक्त तुमच्यासाठीच आहे. जिच नाव आहे पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना. या योजनेत कोणत्याही परिस्थितीत तुमचे पैसे सुरक्षित राहतात. बाजारत होण-या घसरणीचा यावर काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे गुंतवणूकीसाठी ही एक उत्तम स्कीम आहे.
लाभार्थ्यांची मर्यादा
या योजनेत लाभ घेण्यालाठी १९ ते ५५ वर्षांच्या वयाची अट आहे. ही योजना पोस्टल जीवन विमा कार्यक्रमाअंकर्गत सुरु करण्यात आली आहे. यात कमाल विमा १० लाख तर किमान १० हजार रुपये इतका आहे. तसेच पैसे भरण्यासाठी मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षीक असे पर्याय आहेत.
यात मॅच्युरिटी जास्तीत जास्त ८० वर्षांची आहे. तसेच १५०० रुपये भरुण तुम्ही ५० लाखांपर्यत निधी जमा करू शकता. यासाठी हजारो रुपये दिवसाला गुंतवायची गरज नाही. दिवसाला फक्त ५० रुपये भरले तरी खुप आहेत. १० लाखांसाठी या योजनेत किमान विम्याची रक्कम १,५१५ रुपये आहे. यात ५८ वर्षांच्या नागरिकांना १,४६३ तर ६० साठी १,४११ रुपये आहे.
योजनेचा लाभ घेत असताना ४ वर्षांनंतर तुम्ही यावर कर्ज काढू शकता. तसेच तुमचा नॉमिनी देखील दाखवू शकता. पॉलिसी स्विकारलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ती रक्कम नॉमिनीला दिली जाते. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.