
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. त्यापैकीच एक योजना आहे जी बचतीचा पैसा दुप्पट करून देईल. ही योजना खात्रीशीर परताव्याची असून कोणताही भारतीय नागरिक यात गुंतवणूक करू शकतो आणि योजनेच्या माध्यमातून मोठा निधी जोडू शकतो.
ही योजना पैसे दुप्पट करण्याची हमी देते
किसान विकास पत्रातील गुंतवणुकीची रक्कम दुप्पट करण्याची हमी सरकार देते. म्हणजेच या योजनेत 5 लाखांची गुंतवणूक केली तर ती 10 लाख होईल आणि 10 लाख रुपये गुंतवल्यास ती 20 लाख होईल.
किती वेळात ही रक्कम दुप्पट होणार?
जर तुम्ही किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केली तर ती रक्कम 115 महिन्यांत (9 वर्ष, 7 महिने) दुप्पट होईल. योजनेत 10 लाख रुपये जमा केल्यास ते 20 लाख रुपये होतील. सध्या या योजनेवर 7.5 टक्के दराने व्याज मिळत आहे. व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जाते.
कोण उघडू शकतं खातं?
कोणतीही प्रौढ व्यक्ती या योजनेअंतर्गत एकल किंवा संयुक्त खाते उघडू शकते. याशिवाय १० वर्षांवरील मूल आपल्या नावे किसान विकास पत्र घेऊ शकते. अल्पवयीन किंवा अस्वस्थ मनाच्या व्यक्तीच्या वतीने पालक खाते उघडू शकतात. खाते उघडताना आधार कार्ड, वयाचा पुरावा, पासपोर्ट साइज फोटो, केव्हीपी अर्ज फॉर्म आदी कागदपत्रांची आवश्यकता असू शकते.
खाते उघडताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
खाते उघडताना आधार कार्ड, वयाचा पुरावा, पासपोर्ट साइज फोटो, केव्हीपी अर्ज फॉर्म आदी कागदपत्रांची आवश्यकता असू शकते. अनिवासी भारतीय या योजनेसाठी पात्र नाहीत.
वेळेपूर्वी पैसे काढायचे असतील तर…
केव्हीपी खाते जमा केल्याच्या तारखेपासून 2 वर्ष 6 महिन्यांनंतर मुदतपूर्व पैसे काढता येतात. त्याचबरोबर काही विशिष्ट परिस्थितीत प्री-मॅच्युअर डिपॉझिट केव्हाही करता येतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.