अॅडलेड : येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच दरम्यान भारतीय क्रिकेट संघ पहिल्या डावात मोठ्या अडचणीत सापडला होता. दरम्यान, होमपीचवर ऑस्ट्रेलियन टीम भारतीय खेळाडूंना सहज मात देईल असे वाटत होते. परंतु, मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने वैयक्तिक शतकी खेळी करत पहिल्यांदा भागीदारी करत भारताला सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला. अखेर पुजाराच्या महत्त्वपूर्ण फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर ९ बाद २५० धावा केल्या आणि टीमचा जीव भांड्यात पडला.

दरम्यान, पुजाराने त्याच्या कसोटी कारकिर्दीमधील १६ वे शतक पूर्ण करत एकूण ५००० धावांचा पल्ला सुद्धा गाठला आहे. पुजाराने २४६ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने एकूण १२३ धावा पूर्ण केल्या केल्या आणि ८८ व्या शतकात बाद झाला.

india vs Australia first test indian team comeback after cheteshwar pujaras magnificent century