महत्वाच्या बातम्या
-
देवेंद्र फडणवीस दबंग नेता | 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात - चंद्रकांत पाटील
भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गुपचूप आलेल्या अजित पवारांवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या खास शैलीत टीका केली. देवेंद्र फडणवीस हे दबंग नेता असून ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात असं वक्तव्य त्यांनी केले. पुण्यात आज ते पत्रकारांशी बोलत होते.
11 महिन्यांपूर्वी -
पोपटाचा प्राण मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत | शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी सज्ज व्हा - चंद्रकांत पाटील
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना जाहीर देखील खुलं आव्हान दिलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “पोपटाचा प्राण सत्तेमध्ये आहे!; पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी मुंबई महानगरपालिका जिंका आणि महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणा, हेच एकमेव उत्तर आहे.
12 महिन्यांपूर्वी -
राणेंचे वाक्य चुकले नाही, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद | काल सहमत नसणारे चंद्रकांतदादा आज पलटले
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर राज्यातील राजकारण पेटले आहे. मंगळवारी अवघ्या महाराष्ट्रात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत राणेंविरोधात आंदोलने केली. असे असताना नारायण राणेंना अटक करण्यात आली. रात्री उशीरा त्यांना जामीनही देण्यात आला असला तरीही अजुनही शिवसेना-भाजप राज्यात आमने-सामने आल्याचेच चित्र दिसत आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे समर्थन केले आहे.
12 महिन्यांपूर्वी -
राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीबाबत राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांशी चर्चा, ते म्हणाले 'ठिक है' - चंद्रकांत पाटील
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीत भेट झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचा प्रश्न लटकल्याची जोरदार चर्चा होती. परंतु, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमुख जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीबाबतची त्यांना माहिती दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.
1 वर्षांपूर्वी -
युपी निवडणूक | चंद्रकांतदादांना राज भेट नडली? | दिल्लीत ४ दिवस असूनही मोदी-शहांनी भेट दिली नाही
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपचे प्रमुख नेते दिल्लीत आहेत. रविवारी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक देखील झाली. दरम्यान, चार दिवसापासून दिल्लीत असणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मात्र अमित शहा यांनी भेट टाळल्याची चर्चा सुरु झाली आहे. राज्य पदाधिकाऱ्यांसह चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र त्यांना वेळ दिली गेली नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
1 वर्षांपूर्वी -
राज्यपालांचा जो मान ठेवला पाहिजे, तो ठेवला जातं नाही, पण राज्यपाल त्यासाठी समर्थ आहेत - चंद्रकांत पाटील
राज्यपाल तीन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते दोन हॉस्टेलचे उद्घाटन तसेच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेणार आहेत. मात्र, राज्यपाल राज्यात समांतर सत्ताकेंद्र तयार करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे. तर तिथेच राज्यपाल आपल्या दौऱ्यावर ठाम असल्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
आम्ही पूरग्रस्त भागात अनेक वेळा पाण्यात बसून निर्णय करायचो | तुम्हीही डायरेक्ट फिल्डवर उतरा- चंद्रकांत पाटील
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो. बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो. आताही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील वॉर रूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलून आढावा घ्यावा, असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
1 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटील यांच्याकडून अनिल परब आणि नार्वेकरांचं नाव घेत अप्रत्यक्षरीत्या अटकेची धमकी?... काय म्हणाले?
कुणाला अटक झाली तर प्रतिक्रिया द्यायला मी नाशिकमध्येच आहे, असं विधान करून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या धमक्या देण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. आता चंद्रकांतदादांनी मागील काही दिवसांपासून अशी विधान करत सत्ताधाऱ्यांना धमक्या देण्याचा सपाटा लावल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना नेते अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांची चौकशी सुरू आहे, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र त्याही पलीकडील विधान त्यांनी केलं आहे.
1 वर्षांपूर्वी -
प. बंगाल निवडणुकीनंतर आत्मविश्वास वाढला? | भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकणारच - चंद्रकांत पाटील
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या आधी त्यांनी काही वेळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यामुळे देशात पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. 2024 मध्ये कुणाच्याही नेतृत्वात निवडणूक लढवा. भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला आहे.
1 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखं वागतील असं वाटलं नव्हतं - चंद्रकांत पाटील
राज्य विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन काल (६ जुलै) संपलं आहे. या दोन दिवसांच्या वादळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सीबीआय, ईडी यांच्यामार्फत चौकशीतून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न याआधीही अयशस्वी झाले आहेत आणि यापुढेही ते अयशस्वी होतील असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी युती शक्य नसल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
प. महाराष्ट्रापासून अनेक सत्ता केंद्र भाजपच्या हातून सुटताच चंद्रकांतदादा साखर कारखान्यांविरोधात आक्रमक? - सविस्तर वृत्त
राज्य महाविकास आघाडी सरकार आल्यापासून राज्यातील अनेक संस्था भाजपच्या हातून निसटल्या आहेत. विशेष करून कोल्हापूर स्वतःच्या मुठीत घेण्याचा चंद्रकांत दादांचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे आणि आता कोल्हापुरात सरपंच देखील निवडून आणण्याची त्यांच्यात राजकीय शक्ती उरलेली नाही हे देखील पाहायला मिळतंय. संपूर्ण सत्ताकाळात त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात स्वतःचं राजकीय साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न केला, मात्र महाविकास आघाडी सरकार आलं आणि पुढच्या वेळी ते पुण्यातून निवडून येतील का यावरही प्रश्न चिन्ह उपस्थित झालं आहे. परिणामी चंद्रकांतदादा सध्या द्वेशाच्या राजकरणात उतरल्याचे पाहायला मिळतंय.
1 वर्षांपूर्वी -
टोला की लायकी? | पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील हे मोठे कर्तृत्वान गृहस्थ आहेत | अशीच एक प्रतिक्रिया पवारांनी आधीही दिलेली?
राजधानी दिल्लीमध्ये पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रमंचच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस नेते उपस्थित नव्हते. त्यामुळे ही बैठक काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीबाबत चर्चेसाठी होती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यावर आज शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. दिल्लीतील बैठकीबाबत मोठा गैरसमज पसरवण्यात आला. ही बैठक केवळ राजकीय विषयांवर नाही, तर देशातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती, असं शरद पवार यांनी म्हटलंय. त्याचबरोबर देशात काँग्रेसशिवाय पर्यायी शक्ती उभी राहण अशक्य असल्याचंही पवार म्हणाले.
1 वर्षांपूर्वी -
अजितदादा सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर महागात पडेल - चंद्रकांत पाटील
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 18 महिने बोनसमध्ये मिळाले आहेत. आता लोकं झोपत असताना कधीही सरकार पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. 18 महिन्यांपुर्वी सरकार आल्यापासून कुठल्याही क्षणी जाईल यासाठी बॅग भरुन तयार असतानाही 18 महिने त्यांना सरकार मिळाले आहे. यामध्ये कोविड एक भाग आहे तसेच कदाचित त्यांचे नशीबही असेल. देवेंद्र फडणवीस जसे म्हणतात की, दादा झोपेतून उठल्यावर सरकार गेले होते. इतक्या अचानक गेले
1 वर्षांपूर्वी -
५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित
पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसचं आहे. उद्या निवडणुका घ्या, मोदी ४०० पेक्षा जास्त जागा जिंकतील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाने आज मराठा आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
1 वर्षांपूर्वी -
तारीख ३० जुने २०१८ | चंद्रकांतदादा म्हणाले होते 'मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारच्या हातात नाही'
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षण खटल्यात बुधवार, ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार हे स्पष्ट झालं होतं. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायासन क्रमांक ५ येथे हा निकाल घोषित करण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्यात आला आणि समस्त मराठा समाजाला धक्का बसला होता.
1 वर्षांपूर्वी -
सध्या लोकांचं आरोग्य मुख्य मुद्दा | पण जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD चौकशा बाकी - रुपाली चाकणकर
आज एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांच्या धमकीला उत्तर दिलं. ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांनी पराभवसुद्धा सहन करण्याची शक्ती ठेवली पाहिजे. त्यांच्या दुर्दैवाने यापुढे वारंवार त्यांना पराभवाचे फटके बसणार आहेत. त्यामुळे पराभव सहन करण्याची शक्ती ठेवून त्यांनी थोडं सांभाळून बोललं पाहिजे”.
1 वर्षांपूर्वी -
त्या धमकीतून ED, CBI, न्यायालयं आमच्या हातात आहे असं चंद्रकांत पाटील यांना सुचवायचं आहे का? - भुजबळ
आज एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांच्या धमकीला उत्तर दिलं. ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांनी पराभवसुद्धा सहन करण्याची शक्ती ठेवली पाहिजे. त्यांच्या दुर्दैवाने यापुढे वारंवार त्यांना पराभवाचे फटके बसणार आहेत. त्यामुळे पराभव सहन करण्याची शक्ती ठेवून त्यांनी थोडं सांभाळून बोललं पाहिजे” असं भुजबळांनी म्हटलं आहे.
1 वर्षांपूर्वी -
देशात व राज्यात परिस्थिती काय? इथे लोकांना काय करावं हे सुचत नाही अन चंद्रकांतदादांना सुचली कविता
देशात कोरोना रुग्ण बरे होणाच्या वेगामध्ये एका दिवसाच्या आत 111.20% ची वाढ झाली आहे. शुक्रवारी 24 तासांच्या आत विक्रमी 2 लाख 20 हजार 382 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत जगात एका दिवसाच्या आत बरे होणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी एका दिवसात विक्रमी 1 लाख 98 हजार 180 लोक बरे झाले. बुधवारी 192 लाख लोक रिकव्हर झाले होते. मात्र चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याची संख्या सातत्याने वाढत आहे.
1 वर्षांपूर्वी -
राजकीय पक्षाला रेमडेसिवीर मिळालीच कशी हा मूळ प्रश्न | चंद्रकांतदादा पाकिस्तान, चायना, देशाच्या घटनेवर बोलत बसले
आम्ही रेमडेसिवीर घेऊन काय पाकिस्तानला किंवा चायनाला देणार होतो का? आम्ही महाराष्ट्रालाच देणार होतो. मग रेमडेसिवीर घेतल्या तर चुकलं कुठं? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला. विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार असतात. ते माहिती घेऊ शकतात. घटनेतच तशी तरतूद आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांना जाब विचारला. कुणालाही उचलून आणायला काय महाराष्ट्रात बेबंदशाही आहे का? असा सवाल पाटील यांनी केला.
1 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र लॉकडाऊन | मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत - चंद्रकांत पाटील
राज्यात पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार अजुन काही दिवस केवळ शिंदे-फडणवीसांचं 'अति सूक्ष्म कॅबिनेट मंत्रिमंडळच' सांभाळणार?, कारण काय?
-
Multibagger Stocks | हे स्टॉक्स गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत, हजाराचे कोटी करणाऱ्या शेअर्सची यादी सेव्ह करा
-
Weekly Numerology Horoscope | या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींना येत्या आठवड्यात आनंदाची बातमी, धनलाभाचे प्रबळ योग-लाभ
-
Viral Video | त्या लहान मुलांसोबत स्लाइडिंग स्विंगवर खेळू लागल्या, नंतर जे घडलं त्यावर कोणालाही हसू आवरता आलं नाही
-
Viral Video | त्याचा वेगाने येणाऱ्या कारच्या धडकेने मोठा अपघात होतो, नंतर जे घडलं ते पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही
-
हर घर महंगाई | ज्या महागाई - बेरोजगारीच्या मुद्द्यामुळे मोदी सरकार सत्तेत, तेच मुद्दे 2024 भाजपाला भोवणार?
-
Bihar Govt | भाजप अजून एका सहकारी पक्षाला संपवण्याच्या तयारीत?, नितीश कुमारांनी JDU आमदार-खासदारांची बैठक बोलावली
-
Amazon Great Freedom Festival 2022 | अॅमेझॉनने ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये अनेक स्मार्टफोन, गॅझेट्स अत्यंत स्वस्त
-
राज्यात भाजपचं लोकसभा मिशन 48 | शिंदे गट भाजपात विलीन होणार किंवा राजकीय विश्वासघात होणार? | दानवेंच्या विधानाने खळबळ
-
5G Spectrum Auction Scam | 5G स्पेक्ट्रम लिलावात महाकाय घोटाळा झाला?, दाक्षिणात्य नेते आक्रमक, वरिष्ठ पत्रकारांचं ट्विट