शेतकऱ्यांनी MSP वरून मोठ्या लढ्याची तयारी ठेवावी, मोदींचे मित्र अदानी यांच्यामुळे MSP'ची अंमलबजावणी होत नाही - राज्यपाल सत्यपाल मलिक
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला चढवला आहे. “देशात किमान आधारभूत किंमत (एमएसपी) लागू केली जात नाही कारण पंतप्रधानांचा अदानी नावाचा एक मित्र आहे, जो गेल्या पाच वर्षांत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे, “मलिक यांनी द इंडियन एक्सप्रेसला याबाबत सांगितले. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर जबरदस्त लढ्याची तयारी ठेवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
2 वर्षांपूर्वी