महत्वाच्या बातम्या
-
उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी शाळेची भिंत तोडली; सहामाही परीक्षा पुढे ढकलली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचार सभेसाठी जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत दोन ठिकाणी तोडण्यात आली आहे. विशेष म्हणजे शाळेच्या प्रांगणात सभेची परवानगी देताना इमारतीची काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. मात्र शिवसेना नेत्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. दरम्यान, आजच्या सभेमुळे शाळेतल्या परीक्षेचं वेळापत्रकही बदलण्यात आलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
आरे वाचावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार: तेजस ठाकरे
कोणत्याही परिस्थितीत आरे वाचावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. माझ्यासारखे अनेक पर्यावरण प्रेमी या लढाईत एकत्र आले आहेत’, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दूसरे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. युवासेनाप्रमुख आणि शिवसेनेचे वरळी मतदारसंघाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या प्रचार रॅलीत ते सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी प्रतिक्रिया साधत असताना त्यांनी आरे वृक्षतोडीवर आपली भूमिका स्पष्ट केली.
3 वर्षांपूर्वी -
५ वर्षांत राजीनामे खिशातून निघाले नाहीत: राज ठाकरे
विधानसभा निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दहिसरमध्ये येथे सभा झाली. राज यांनी त्यांनी शिवसेना-भाजप सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. शिवसेना-भाजप होर्डिंगच्या खाली लिहिलंय ‘हीच ती वेळ’, यावरून राज यांनी टोला लगावला. राज म्हणाले, मग ५ वर्षे वेळ नव्हता का? गेली ५ वर्ष यांना खिशातले राजीनामे बाहेर काढता आले नाहीत. फक्त धमक्या दिल्या. त्या धमक्याही फक्त पैशाचे काम अडले की देतात.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO: सेनेच्या वचननाम्यातील विजेच्या मुद्द्यावरून मतदाराला २००९ पासून टोप्या; २०१४मध्ये सत्तेत तरी तेच
“वचननाम्यात वचनं विचार करून देण्यात आली आहे. शिवसेना जे बोलते ते करते. राज्याच्या तिजोरीवर किती भार पडेल याचा विचार करूनच हा वचननामा तयार करण्यात आला आहे. १० रूपयांमध्ये अन्न देण्याचा घेतलेल्या निर्णयात आम्ही बचतगटांची मदत घेणार आहोत. तिजोरीवर कितीवर भार पडेल हा विचार करून आम्ही जेवण १० रूपयांनी देण्याचा निर्णय घेतला आहे. समतोल ढळणार नाही याचा विचार करून वचननामा तयार केला आहे. यातलं एकही मत खोटं ठरणारं नाही,” असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई यांच्या उपस्थिती आज हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेच्या या वचननाम्यात आश्वासनांची खैरात वाटण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
नवा वचननामा प्रसिद्ध; १२ मंत्री व ६३ आमदारांनी ५ वर्षात काय दिवे लावले त्यावर तोंड बंद
“वचननाम्यात वचनं विचार करून देण्यात आली आहे. शिवसेना जे बोलते ते करते. राज्याच्या तिजोरीवर किती भार पडेल याचा विचार करूनच हा वचननामा तयार करण्यात आला आहे. १० रूपयांमध्ये अन्न देण्याचा घेतलेल्या निर्णयात आम्ही बचतगटांची मदत घेणार आहोत. तिजोरीवर कितीवर भार पडेल हा विचार करून आम्ही जेवण १० रूपयांनी देण्याचा निर्णय घेतला आहे. समतोल ढळणार नाही याचा विचार करून वचननामा तयार केला आहे. यातलं एकही मत खोटं ठरणारं नाही,” असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. तसंच घरगुती वीजेचे दरही कमी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई यांच्या उपस्थिती आज हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेच्या या वचननाम्यात आश्वासनांची खैरात वाटण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
१ रुपयात झुणका भाकर योजनेचे तीनतेरा; आता १० रुपयात 'जेवण थाळी'
एप्रिल २०१५ मध्ये मुंबईतील झुणका भाकर केंद्र तोडण्याच्या नोटिसा महापालिकेने बजावल्या होत्या. ही केंद्रे गोरगरीब जनतेला स्वस्त जेवण पुरवणारी असून, अनेकांना रोजगार देणारी होती. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली होती.
3 वर्षांपूर्वी -
१२४ जागा लढवून शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा होईल, सुनिल ताटकरेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं कौतुक करत शिवसेनेवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना जाब विचारणाऱ्या, नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्या व समस्यांवर आवाज उठवणाऱ्या सक्षम, प्रबळ, कणखर विरोधी पक्षाची राज्याला गरज आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना विजयी करून सक्षम विरोधी पक्षासाठी संधी द्या, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वांद्रे येथील त्यांच्या पहिल्या जाहीर सभेत केले.
3 वर्षांपूर्वी -
नवी मुंबई: शिवसेनेतील अंतर्गत वादातून स्वकीयांना जीवे मारण्याच्या धमक्या
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना अनेक शहरांमध्ये पक्षातील अंतर्गत वाद टोकाला जाताना दिसत आहेत. त्यात नवी मुंबईमध्ये शिवसेनेच्या वाट्याला एकही मतदारसंघ आलेला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सेनेच्याच पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेनेला धक्का! कल्याणमधील २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांचे राजीनामे
‘आमचं ठरलंय’ असे सांगून निवडणुकीत युती करणाऱ्या शिवसेना-भारतीय जनता पक्षामधील स्थानिक पातळीवरील संघर्ष शमण्याची चिन्हे नाहीत. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यानच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कल्याण-डोंबवली आणि उल्हासनगर महानगरपालिकेतील २६ नगरसेवक आणि ३०० कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे सपुर्द केले आहेत. जागावाटपावरून ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
3 वर्षांपूर्वी -
बेरोजगारांना संधी कशी देता येईल याच्यासाठी शिवसेना काम करत आहे: उद्धव ठाकरे
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एकाच व्यासपीठावर दिसतील, अशी भविष्यवाणी सुशीलकुमार शिंदे यांनी केली होती. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला आहे. ‘शिंदे म्हणाले की दोन्ही काँग्रेस पक्ष थकले आहेत, कदाचित खाऊन-खाऊन थकले असतील, अशी मिश्किल टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली. संगमनेरमध्ये भाजप-शिवसेनेच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
MTNL कामगारांना स्वतःच कुटुंब समजणारे मंत्री अरविंद सावंत शांत कसे? कर्मचाऱ्यांचे सवाल
आर्थिक विवंचनेपोटी कर्मचाऱ्यांचे वेतनही देऊ न शकलेल्या सरकारच्या दोन्ही दूरसंचार कंपन्या बंदच करण्याची सूचना सरकारला करण्यात आली आहे. दूरसंचार विभागाने सादर केलेला सार्वजनिक कंपन्यांसाठी ७४,००० कोटी रुपये अर्थसाहाय्य प्रस्तावही फेटाळून अर्थ खात्याकडे लावला आहे. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) वर ९५,००० कोटी रुपयांचा अर्थभार आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये १.६५ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणाचा प्रस्तावही बारगळला आहे.सरकारच्या दोन्ही दूरसंचार कंपन्या बंद करणे फारसे आर्थिक नुकसानीचे ठरणार नाही, असे केंद्रीय अर्थ खात्याचे म्हणणे आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांना अन्यत्र सामावून घेण्याचीही सरकारची तयारी असल्याचे सांगण्यात येते.
3 वर्षांपूर्वी -
सेना-भाजपाला तब्बल ३० जागांवर बंडखोरांचा फटका बसण्याची शक्यता
राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी मैदानात उतरलेल्या शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीची बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली आहे. राज्यातील एकूण ३० विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांनी बंडखोरी केल्याने या तीसही जागांवर महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत बंड शमवण्यात महायुतीला यश आले नाही. काही नेत्यांनी आपली तलवार म्यान केली. मात्र, काही नेत्यांनी बंडाचा झेंडा उचलला. या बंडखोरीमुळे शिवसेना-भारतीय जनता पक्षाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.
3 वर्षांपूर्वी -
पिंपरी: राज यांच्या सभेकडे प्रसार माध्यमं केंद्रित होण्याच्या चिंतेने उद्धव यांची सभा रद्द?
निवडणूक आली की नेत्यांची जाहीर सभांमधूनच जुगलबंदी सुरू होती. त्यात जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आमने सामने आल्यानंतर ही जुगलबंदी टोकाला पोहचते. विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव हे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसैनिकांना संबोधित करणार होते.
3 वर्षांपूर्वी -
बंडखोरांना शांत करण्याचा भाजप-सेनेकडे शेवटचा दिवस
भाजप आणि शिवसेनेची युती झाली असली तरी राज्यात युतीसाठी पूरक असे वातावरण सध्यस्थितीत दिसत नाही. त्यामागील कारणही अगदी तसेच आहे. राज्यात चंद्रपूर जिल्हा सोडला तर प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप पक्षाच्या बंडखोरांनी युतीच्या उमेदवाराला आव्हान दिले आहे. या बंडखोरांचा फार मोठा फटका युतीच्या उमेदवाराला बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान दोन्ही पक्षांना असणार आहे. दरम्यान, आज म्हणजे सोमवारी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज बंडखोरांची मनधरणी करण्यात शिवेसेना आणि भाजपला यश आले नाही, तर त्याचा मोठा फटका युतीच्या उमेदवारांना बसणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
सरकारचं ‘झाडे लावा, झाडे जगवा’ जुनं झालं; आता 'कर्फ्यू लावा, झाडे पाडा'
शनिवार, रविवारच्या धुमश्चक्रीनंतर आरेमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असून, ती अनिश्चित काळासाठी लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याविरोधात पर्यावरणप्रेमी मुंबईकरांनी निषेध नोंदवला असून, ‘आरेमध्ये नेमकी कोणती देशद्रोही कारवाई होण्याची शक्यता आहे की ज्यामुळे तिथे सरकारला रविवारीही जमावबंदी कायम ठेवावी लागली?’ असा प्रश्न हे मुंबईकर करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
भांडुपचे शिवसेना आमदार अशोक पाटील यांना तिकीट नाकारल्याने समर्थकांचा मातोश्रीवर ठिय्या
शिवसेनेत दाखल झालेल्या प्रदीप शर्मा, दिपाली सय्यद या बाहेरून आलेल्या नेत्यांना उमेदवारी जाहीर होत असताना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना देखील शिवसेनेते तिकीट दिले आहे. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाडेश्वर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत विश्वनाथ महाडेश्वर यांची मुंबईच्या महापौरपदी निवड करण्यात आली होती. आता शिवसेनेच्या तिकिटावर ते वांद्रे पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
२०१५ मध्ये तृप्ती सावंत यांचा राणेंविरुद्ध भावनिक वापर केला; २०१९ मध्ये पत्ता कट
शिवसेनेत दाखल झालेल्या प्रदीप शर्मा, दिपाली सय्यद या बाहेरून आलेल्या नेत्यांना उमेदवारी जाहीर होत असताना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना देखील शिवसेनेते तिकीट दिले आहे. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाडेश्वर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत विश्वनाथ महाडेश्वर यांची मुंबईच्या महापौरपदी निवड करण्यात आली होती. आता शिवसेनेच्या तिकिटावर ते वांद्रे पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
पालघर: शिवसेनेचे विद्यमान आमदार अमित घोडा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
निवडणुकांचे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली असताना देखील अजून पक्षप्रवेश सूरच आहेत. सत्ताधारी पक्षातील म्हणजे शिवसेना आणि भाजपमधील तिकीट न मिळालेली मंडळी दुसऱ्या पक्षात उडया घेताना दिसत आहेत. पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमित घोडा यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आता एनसीपी’मध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेने पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल
शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्याआधी आदित्य ठाकरे यांनी वाजतगाजत रोड शो केला. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. शिवसैनिकांमध्ये यावेळी प्रचंड उत्साह दिसत होता. आदित्य यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे आणि लहान भाऊ तेजस ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते.
3 वर्षांपूर्वी -
घाटकोपरमधील कट्टर शिवसैनिक बोलतात, 'आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला'
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Gold and Silver Price | सोन्या-चांदीची चमक वाढली | पाहा आजचा मुंबई आणि इतर शहरातील दर
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Prudent Corporate Advisory IPO | प्रूडेंट कॉर्पोरेट अॅडव्हायजरी शेअरची लिस्टिंग प्रथम जोमात नंतर कोमात
-
Paytm Share Price | पेटीएमचा तोटा 762 कोटीवर पोहोचला | शेअर्सची किंमत अजून कोसळणार?
-
Aadhaar Card Photo | आधार कार्डचा फोटो बदलायचा की अपडेट करायचा आहे? | जाणून घ्या प्रक्रिया
-
Multibagger Stock | 33 दिवसात 164 टक्के परतवा देणारा हा जबरदस्त शेअर तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
-
Adani Group Stocks | अदानी ग्रुप आता या क्षेत्रात प्रवेश करणार | या कंपनीच्या माध्यमातून करणार व्यवसाय