5 May 2024 1:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी
x

दाऊदच्या नावाने बोंबाबोंब करून मुंबईकरांना महागाई, बेरोजगारीवरून विचलित करायचं | निवडणुकीत हिंदू-मुस्लिम फूट पाडायची

Mumbai BJP Morcha

मुंबई, 09 मार्च | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. ठाकरे सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा त्वरित घ्यावा, या मागणीसाठी मुंबई आज विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. आधी भायखळा इथून आझाद मैदानाकडे निघणार होता.

मात्र याला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर हा मोर्चा आता आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा होणार आहे. या मोर्चासाठी आझाद मैदानात एक मोठे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. याचबरोबर शेकडो खुर्च्या आणि बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आले आहेत. फक्त आझाद मैदान नाही तर संपूर्ण मुंबईभर असे शेकडो बॅनर्स भाजपने लावले आहेत. साडे दहा वाजताच्या दरम्यान या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होणार होती.

केंद्राशी संबंधित महागाई आणि बेरोजगारीचा भडका आणि मुंबई महानगर पालिका निवडणूक :
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पेट्रोल-डिझेलचे दर प्रचंड वाढले आणि परिणामी मोठ्या प्रमाणावर महागाई देखील वाढली आहे. त्यात रशिया-युक्रेन युद्धाने भर टाकल्याने मोदी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच कोरोनामुळे वाढलेली बेरोजगारी हे मुंबईकरांसाठी गंभीर विषय बनले आहेत. त्यामुळे या सर्व रोजच्या प्रश्नांपासून मुंबईकरांना विचलित करून आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत दाऊदच्या नावाने बोंबाबोंब करून हिंदू-मुस्लिम फूट पाडायची अशी भाजपची योजना असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे भाजपच्या या राजकीय ट्रॅपमध्ये सामान्य मुंबईकर अडकणार की तो महागाई आणि बेरोजगारीवरून मोदी सरकारला जाब विचारणार ते पाहावं लागणार आहे.

५ वर्ष मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना फडणवीस शांत राहिले :
सध्या फडणवीस मंत्री नवाब मलिक यांच्या नावाने राजकीय कांगावा करत असले तरी ते महाविकास आघाडी सरकार येण्यापूर्वी ५ वर्ष राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देखील होते. मात्र संपूर्ण कार्यकाळात त्यांनी या विषयावर चकार शब्द देखील काढल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे फडणवीसांचा हेतू देखील राजकीय संशय वाढवणारा आहे असंच म्हणावं लागेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mumbai BJP Morcha over Nawab Malik resignation.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x