हैदराबाद : आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया संघात एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टी-20 मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यास भारतीय संघ उत्सुक असेल. उभय संघात ऑस्ट्रेलियात झालेल्या वनडे मालिकेत भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. त्याच विजयाची पुनरावृत्ती करण्यास भारतीय संघ सज्ज झाला आहे.

दरम्यान, भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 236 धावाच करता आल्या.

India vs australia first one day cricket match and australia set target of 237 runs for india