नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं. तसेच बेजगाम जिल्ह्यामधून एका भारतीय लष्कराचं अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर भागात प्रचंड भीतीदायक वातावरण पसरले आहे.

दरम्यान, भारतातील मुख्य शहरांमध्ये देखील सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी अकरा वाजता केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीमधून ही पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.

External affairs ministry arranged for press conference today at new delhi