नवी दिल्ली : कॉंग्रेस सत्तेवर आल्यास देशातील जनतेला न्याय देईल, असे म्हणत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची न्याय योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत वीस टक्के गरीब कुटुंबांना वर्षाला ७२,००० रुपये देणार, असे ते म्हणाले. पाच कोटी कुटुंबातील २५ कोटी लोकांना या योजनेचा फायदा होईल, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वर्गाला आर्थिक आधार मिळेल.

याविषयी आम्ही अर्थतज्ज्ञांशी चर्चा केली असून अशी मदत करणे शक्य असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दिला, आपण न्याय योजनेबाबत बोलण्यासाठी पत्रकारांच्या समोर आलो आहोत, असे त्यांनी सांगितले. भारत आणि इंडियामधील दरी संपवायची असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Twenty most poor families in India will get yearly 72 thousand rupees direct in their bank accounts says congress president rahul gandhi