नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपताना दिल्लीत आज भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद झाली. दरम्यान आजच्या या पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदींनी प्रसार माध्यमांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही. या पत्रकार परिषदेत मोदींसोबत अमित शहा आणि इतर नेतेमंडळी उपस्थित होती. मात्र जर पत्रकार परिषदेत मोदींना प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरच द्यायची नव्हती तर त्यांनी येथे हजेरी तरी का लावली असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, अमित शाह यांनी भाजप सरकारकडून करण्यात आलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला आणि प्रचाराबाबतची माहिती दिली. यावेळी उपस्थित पत्रकारांनी मोदींना प्रश्न विचारताच ‘अध्यक्षजी जवाब देंगे’ असं उत्तर देत स्वतःचा बचाव केला आणि जवाबदारी झटकल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषणबाजीत टाळ्या प्राप्त करण्यासाठी पाकिस्तानचं नाव काढत ‘ये मोदी हैं, जवाब जरूर देगा’ अशा बाता मारणाऱ्या मोदींची देशातील पत्रकार परिषदेत काही न बोलताच दांडी गुल झाल्याचे पाहायला मिळाले.
त्यामुळे ५ वर्षात पत्रकार परिषद घेण्यास घाबरणाने मोदी अखेर पर्यंत तो विक्रम कायम ठेवण्यात यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले. कदाचित शेवटच्या क्षणी ते असं काही तरी बोलण्याच्या ओघात बोलून जायचे की त्याचा लोकसभा मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मोठा फटका बसायचा अशी भीती भाजपलाच असावी अशी कुजबुज सुरु झाली आहे.
PM Narendra Modi: It will happen after a long time in the country, our Government will come to power with absolute majority for second consecutive time. pic.twitter.com/Jr1biKJNGa
— ANI (@ANI) May 17, 2019
