5 May 2024 7:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

आ. भातखलकरांचा पत्ता कट होणार? उत्तर भारतीय नेते रमेशसिंग ठाकूर यांना संधी?

BJP Mumbai, BJP Maharashtra, MLA Atul Bhatkhalkar, Former MLA Ramesh Singh Thakur, Maharashtra State Assembly Election 2019

मुंबई : विधानसभा निवडणुका जवळ आल्याने पक्षांतर्गत स्पर्धा देखील वेगाने होऊ लागल्या आहेत आणि त्यात विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यासाठी अनेक नेते मंडळी सरसावल्याचे दिसत आहे. त्याचाच प्रत्यय सध्या कांदिवली मतदारसंघात पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय मतदार असल्याने काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार रमेशसिंग ठाकूर यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तशा प्रकारच्या हालचाली इथल्या भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळत असून विद्यमान आमदार अतुल भातखळकर यांच्याविरुद्ध बंड पुकारलं जाऊ शकतं.

काँग्रेसमध्ये आमदार पद भूषविणारे रमेशसिंग ठाकूर २०१४ मधील निवडणुकीत पराभूत झाले आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. स्वतः शिकलेले नसले तरी ते शिक्षण सम्राट आहेत हे नवल आणि अर्थशक्तीच्या बळावर विद्यमान आमदार अतुल भातखळकर यांचा पत्ता कट होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. आजच्या घडीला या मतदारसंघात भाजपचे एकूण ७ नगरसेवक आहेत. मात्र हे सर्व नगरसेवक आमदार अतुल भातखालकरांवर प्रचंड नाराज असल्याचं समजतं. त्यांच्या फटकळ आणि चिडून बोलण्याच्या स्वभावामुळे कार्यकर्ते देखील नाराज आहेत.

दरम्यान धारावीनंतरची सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या हनुमान नगरची एकत्रित विकास योजना अतुल भातखालकरांमुळेच रखडल्याचं स्थानिक रहिवासी सांगतात आणि त्यामुळे तब्बल १८ हजार कुटुंबाच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिक मतदार देखील त्यांच्यावर प्रचंड नाराज असल्याचं समजतं. कांदिवली विधानसभा मतदारसंघात ३५ टक्के मराठी मतदार, गुजराती-मारवाडी-जैन २७ टक्के मतदार तर २४ टक्के उत्तर भारतीय मतदार आहेत. त्यामुळे आघाडीत मनसे सामील झाल्यास काँग्रेस-एनसीपी-मनसे उमेदवार देखील मोठी लढत देऊ शकतो असा हा मतदारसंघ आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x