3 May 2025 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

आ. भातखलकरांचा पत्ता कट होणार? उत्तर भारतीय नेते रमेशसिंग ठाकूर यांना संधी?

BJP Mumbai, BJP Maharashtra, MLA Atul Bhatkhalkar, Former MLA Ramesh Singh Thakur, Maharashtra State Assembly Election 2019

मुंबई : विधानसभा निवडणुका जवळ आल्याने पक्षांतर्गत स्पर्धा देखील वेगाने होऊ लागल्या आहेत आणि त्यात विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यासाठी अनेक नेते मंडळी सरसावल्याचे दिसत आहे. त्याचाच प्रत्यय सध्या कांदिवली मतदारसंघात पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय मतदार असल्याने काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार रमेशसिंग ठाकूर यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तशा प्रकारच्या हालचाली इथल्या भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळत असून विद्यमान आमदार अतुल भातखळकर यांच्याविरुद्ध बंड पुकारलं जाऊ शकतं.

काँग्रेसमध्ये आमदार पद भूषविणारे रमेशसिंग ठाकूर २०१४ मधील निवडणुकीत पराभूत झाले आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. स्वतः शिकलेले नसले तरी ते शिक्षण सम्राट आहेत हे नवल आणि अर्थशक्तीच्या बळावर विद्यमान आमदार अतुल भातखळकर यांचा पत्ता कट होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. आजच्या घडीला या मतदारसंघात भाजपचे एकूण ७ नगरसेवक आहेत. मात्र हे सर्व नगरसेवक आमदार अतुल भातखालकरांवर प्रचंड नाराज असल्याचं समजतं. त्यांच्या फटकळ आणि चिडून बोलण्याच्या स्वभावामुळे कार्यकर्ते देखील नाराज आहेत.

दरम्यान धारावीनंतरची सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या हनुमान नगरची एकत्रित विकास योजना अतुल भातखालकरांमुळेच रखडल्याचं स्थानिक रहिवासी सांगतात आणि त्यामुळे तब्बल १८ हजार कुटुंबाच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिक मतदार देखील त्यांच्यावर प्रचंड नाराज असल्याचं समजतं. कांदिवली विधानसभा मतदारसंघात ३५ टक्के मराठी मतदार, गुजराती-मारवाडी-जैन २७ टक्के मतदार तर २४ टक्के उत्तर भारतीय मतदार आहेत. त्यामुळे आघाडीत मनसे सामील झाल्यास काँग्रेस-एनसीपी-मनसे उमेदवार देखील मोठी लढत देऊ शकतो असा हा मतदारसंघ आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या