मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. निकालाचा पहिला कल महायुतीच्या बाजूने लागला आहे. जवळपास १६५ च्या वर महायुतीने आघाडी घेतली आहे तर महाआघाडी ९० जागांच्या वर आलेली आहे.
२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने १२२ जागा तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. मात्र या निवडणुकीत भाजप तब्बल ९० जागांवर तर शिवसेना ५५ जागांवर घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेवर मतदार खुश नसल्याचं चित्र असून केवळ स्थानिक उमेदवारांच्या संपर्कावरून त्यांनी अनेक ठिकाणी जागा राखल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र यामध्ये शिवसेनेची बार्गेनिंग पावर वाढल्याचं म्हटलं जातं आहे.
