21 September 2024 6:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Piccadily Agro Share Price | दारू नव्हे, हा दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 1 लाखाचे झाले 96 लाख रुपये - Marathi News Penny Stocks | शेअर प्राईस 44 रुपये, 5 दिवसांत 45 टक्के परतावा दिला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Salman Khan | सलमानच्या वडिलांना गँगस्टर लॉरेंस बिश्नोईकडून पुन्हा धमकी, महिला म्हणाली, 'लॉरेंस को भेजू क्या' - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - Marathi News Smart Investment | महिलांसाठी भन्नाट सरकारी योजना, फक्त 1000 रुपये बचत आणि मिळतील 2 लाख रुपये - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेत असाल तरा त्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होईल - Marathi News
x

शपथविधीत छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांच्या उल्लेखाला भाजपचा आक्षेप

Chief Minister Uddhav Thackeray, Oath Ceremony, Opposition leader Devendra Fadnavis

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला आज बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागणार आहे. दुपारी २ च्या सुमारास विधानसभेत बहुमत ठराव मांडण्यास सुरुवात झाली आहे. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील सभागृहाचं कामकाज सांभाळत आहेत. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षाकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

एक हंगामी अध्यक्ष हटवून दुसरे अध्यक्ष बदलल्याची घटना देशाच्या इतिहासात कधी घडली नव्हती. त्यामुळे सरकारला अध्यक्ष का बदलावा लागला. संविधानाची पायमल्ली होत आहे. हंगामी अध्यक्ष झाल्यानंतर आजवर विश्वासमताचा प्रस्ताव आला नाही. तुम्हाला कसली भीती होती. गुप्त मतदान पद्धतीने मतदान झालं तर आपला विश्वास दर्शक ठराव मंजूर होणार नाही. याची भीती तुम्हाला होती. त्यामुळेच सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आले असं फडणवीस म्हणाले. एकूणच शपथ विधीसोहळ्यात उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने स्वतःच्या नेत्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत या थोर महापुरुषांना देखील वंदन केलं होतं. त्यामुळे साहजिकच स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधीसहित सर्वच म्हणजे एकूण मूळ शपथविधील इतर महापुरुषांच्या उल्लेखाला देखील न बोलताच विरोध दर्शवला अशी चर्चा रंगली आणि त्याची चर्चा देखोल विधानसभेत रंगली ज्यावर स्वतः मुख्यमंत्री आणि जयंत पाटील यांनी देखील भाष्य केलं.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचा शपथवीधीदरम्यान जर उल्लेख झाला तर भाजपाला राग का यावा. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल भाजपाला असूया आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी केला.

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीच्या सदस्यांमध्ये जोरदार हंगामा झाल्याचं पहायला मिळालं. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून दादागिरी नही चलेगी अशी घोषणाबाजी केली. तसंच यावेळी मंत्र्यांचा परिचय सुद्धा योग्य नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवरही आक्षेप घेतला. देशाच्या इतिहासात हंगामी अध्यक्ष कधीही निवडण्यात आले नाही. हंगामी अध्यक्ष बदलण्याची गरज काय पडली असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केली. नियम, कामकाज धाब्यावर बसवून विधीमंडळाचं काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

महत्वाची सूचना: आता तुम्ही सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज’वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास.

https://www.maharashtranama.com/online-test/

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x