3 May 2024 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा
x

भाजप नको पण शिवसेना चालेले हा मुस्लिमांचा आग्रह; पवारांच्या विधानाने सेनेची अडचण

Sharad Pawar, Minorities

मुंबई: शिवसेना काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत महाविकास आघाडी’करून सत्तेत आली खरी, मात्र त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या विधानाने अधिकच राजकीय पेचात सापडत आहे असंच म्हणावं लागेल. अगदी काँग्रेसमध्ये सर्वजण शांत झाले की खासदार संजय राऊत कोणत्या ना कोणत्या तरी विधानाने शिवसेनेची अडचण वाढवताना दिसत आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही त्याला पुष्टी देणारे विधान केले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला कोणत्याही अल्पसंख्याक सदस्याचा आक्षेप नाही तर काहीही करून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवायला हवे, असेच अल्पसंख्यकांच्या प्रतिनिधींचे म्हणणे होते, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत पवारांनी नवी आघाडी कशी आकाराला आली, त्याचा उहापोह केला. यावेळी शिवसेनेसोबत आघाडी करताना भारतीय जनता पक्षाला मात्र तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सत्तेपासून दूर ठेवा, असे सर्वांचेच म्हणणे होते, असेही पवार यांनी पुढे नमूद केले.

तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानाने शिवसेनेच्या अडचणी पुन्हा वाढणार होतं. मुस्लिम समाजाने सांगितल्यामुळेच काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत आहे असं विधान अशोक चव्हाण यांनी केलं होतं. सीएए विरोधात आयोजित रॅलीत त्यांनी केलेल्या धक्कादायक विधानानंतर आता राजकारण रंगलं होतं.

नांदेडमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध कऱण्यासाठी आयोजित रॅलीत बोलताना अशोक चव्हाणांचं हे धक्कादायक वक्तव्य चांगलंच वादात सापडलं होतं. भाजप हा मुस्लिमांचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं मुस्लिम समाजाने आपल्याला सांगितल्याचा दावा त्यांनी केला होता. मुस्लिमांनी सांगितल्यामुळेच काँग्रेस राज्यात सत्तेत सहभागी झाल्याचा दावा त्यांनी केला होता.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x