9 May 2024 4:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

हे ऑटो रिक्षा सरकार; फार काळ टीकणार नाही: देवेंद्र फडणवीस

Opposition Leader Devendra Fadnavis, Delhi Politics

मुंबई : मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. मी महाराष्ट्र सोडणार नाही, असे सांगत दिल्लीत जाणार नाही हे स्पष्ट केले. आमचे सरकार पुन्हा आणारच, असा निर्धार करत माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी केला. जोपर्यंत महाराष्ट्रात सरकार येत नाही तोपर्यंत जाणार नाही. सध्याचे सरकार हे राजकीय हाराकिरी करून आलेले सरकार आहे. आपले सरकार बहुमताने आलेले होते. उद्या भविष्यात मोठे यश मिळल्याशिवाय राहणार नाही, असा दावा फडवणीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला भाषणाआधी काही जणांनी विचारलं, तुम्ही दिल्लीला चालला आहात का? मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो. मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. या महाराष्ट्रात जोपर्यंत पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार येत नाही तोपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सोडणार नाही. या महाराष्ट्रातच संघर्ष करुन पुन्हा भारतीय जनता पक्षाचं, शिवसंग्राम आणि आपल्या युतीचं सरकार आणल्याशिवाय मी राहणार नाही.

अरबी समुद्राचा मुद्दा उपस्थित करत, जाणीवपूर्वक शिवस्मारकाचं काम थांबविण्याचं काम हे सरकार करत आहे. ऑटो रिक्षा सरकार असून या सरकारची तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशेने जात आहेत. त्यामुळे, हे सरकार फार काळ टीकणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. भविष्यकाळात संधी मिळाल्यास राहिलेली काम पूर्ण करूयात. मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी मी नाही. या महाराष्ट्रात जोपर्यंत पुन्हा सरकार येत नाही, तोपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सोडणार नाही. महाराष्ट्रात संघर्ष करुन भारतीय जनता पक्ष आणि शिवसंग्राम युतीचं सरकार आणल्याशिवाय मी गप्प राहणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

आम्ही बदल्याच्या भावनेने कधीही वागलो नाही. मात्र हे सरकार प्रगती नाही तर स्थगिती सरकार आहे अशीही टीका फडणवीस यांनी केली. एवढंच नाही तर शिवस्मारकाचं काम या सरकारने जाणीवपूर्वक थांबवलं असाही आरोप फडणवीस यांनी केला. लोकशाहीची मूल्य या सरकारला मान्य नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला तर आम्हीही रस्त्यावर उतरवू आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ असा इशाराही विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी दिला.

 

Web Title:  I am not going to Delhi Politics says Former CM Devendra Fadnavis.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x