29 April 2024 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट
x

शिवजयंती ३६५ दिवस साजरी व्हायला हवी; आपले सर्व सण तिथीनुसारच

MNS Chief Raj Thackeray, Aurangabad Shiv Jayanti Utsav, Sambhajinagar

औरंगाबाद, १२ मार्च : औरंगाबादमध्ये आज मनसेचा शिवजयंती उत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी, ३६५ दिवस शिवजयंती साजरी व्हायला हवी असं म्हटलंय. कोणताही सण तारखेनुसार नसतो. हिंदू संस्कृतीनुसार तिथीनुसार सर्व सण साजरे होत असतात. शिवजयंती हा एक सण आहे. त्यामुळे हा सणही तिथीनुसारच साजरा केला जावा, असं राज ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना राज ठाकरेंनी हा उत्सव दिमाखात साजरा कराल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली. तसंच शोभायात्राही उत्साहात पार पडेल अशी आशा असल्याचं म्हणाले. शिवजयंती साजरी होत असताना गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. करोनासंबंधी बोलताना राज ठाकरेंनी आधीच या देशात रोगराई आहे त्यात अजून एक वाढला तर काय फरक पडतो असं म्हटलं. काळजी घेतली पाहिजे यात काही वाद नाही. महाराष्ट्रात कोणाला लागण होता कामा नये अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

अशा कुठल्याही गोष्टीची लागण महाराष्ट्रात होता कामा नये. याची लागण काही जणांना झाली आहे, पण तेसुद्धा बरे होतील. स्वतःची तुम्ही काळजी घेणं आवश्यक आहे. हा उत्सव तुम्ही दिमाखात साजरा कराल, संध्याकाळची शोभायात्राही मोठ्या थाटात पार पाडाल, मला याची खात्री आहे. त्याला कोणतंही गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्या, असंही आवाहनही राज ठाकरेंनी मनसैनिकांना केली आहे. तसेच शिवजयंती तिथीनुसार साजरी करायची की तारखेनुसार यासंदर्भातही राज ठाकरेंनी परखडपणे आपलं मत व्यक्त केलं आहे.

 

News English Summery: MNS president Raj Thackeray has said that Shiv Jayanti should be celebrated in Maharashtra for 365 days. According to the date, Raj Thackeray arrived in Aurangabad to celebrate Shiv Jayanti. Today, in the presence of activists, he celebrated Shiv Jayanti. Speaking at this time, he said that the Maharaja’s birth anniversary should be celebrated like that. Speaking on the issue as to whether Shiv Jayanti should be celebrated on the date, Raj Thackeray said, “I went to Jayant Salgaonkar a few years back. They asked me if I wanted to celebrate the date of Shiv Jayanti. He said that it would take 365 days. But to be told why, according to dates, we do what we celebrate all year long. No festival is celebrated on a date. Maharaj’s birth anniversary is a festival for us. So it should be celebrated like a festival.

 

Web News Title: Story MNS Chief Raj Thackeray in Aurangabad for Shivjayanti Utsav Sohala.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x