नवी दिल्ली, २९ सप्टेंबर : भाजपाचे आमदार तेजिंदर सिंह बग्गा यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. ही मुलाखत कधीची आहे, याबाबतचा उल्लेख बग्गा यांनी केलेला नाही. मात्र, या मुलाखतीवरून बग्गा यांनी सुब्रमण्यम स्वामी (BJP MP Subramaniam Swamy) यांच्यावर टीका केली आहे. “गिरगिट (रंग बदलणारा सरडा) स्वामी म्हणत आहे की, पंतप्रधान मोदी यांचं राम मंदिर उभारणीमध्ये कोणतंही योगदान नाही आणि राजीव गांधींना यांचं श्रेय देत आहे,” अशी टीका बग्गा यांनी केली आहे.

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या निर्णयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काहीही योगदान नाही. सरकारमध्ये असताना त्यांनी यासंदर्भात असं कोणतही काम केलेलं नाही, असं सांगत भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराच्या प्रश्नावरून मोदींवर निशाणा साधला. विशेष म्हणजे स्वामी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींना यांचं श्रेय दिलं आहे.

टीव्ही ९भारतवर्ष वृत्तवाहिनीशी बोलताना स्वामी यांनी धक्कादायक विधान केलं आहे. “पंतप्रधानांचं यामध्ये कोणतंही योगदान नाही. राम मंदिर प्रकरणात सर्व चर्चा आम्ही लोकांनी केली आहे. सरकारच्या वतीनं त्यांनी असं कोणतंही काम केलेलं नाही, जे मला माहिती आहे किंवा ज्यामुळे म्हणू शकतो की, निर्णय आला. मूळात ज्यांनी यात काम केलं आहे, त्यांचं मी नावं घेतलं आहे. यात पहिलं नावं राजीव गांधी यांचं आहे,” असं स्वामी म्हणाले आहेत.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi has no part in the decision to build a Ram temple in Ayodhya. BJP MP Subramaniam Swamy targeted Modi over the Ram Mandir issue, saying he had not done anything like that in the government. What is special is that Swami has given credit to former Prime Minister Rajiv Gandhi.

News English Title: BJP leader Subramanyam Swamy Ram Mandir Ram Temple PM Narendra Modi Tejindar Bagga Marathi News LIVE latest updates.

राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही | खरं श्रेय राजीव गांधींचं  – सुब्रमण्यम स्वामी