2 May 2024 5:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Bihar Election | RJD सत्तेत आल्यास दहशतवादी काश्मीर सोडून बिहारमध्ये आश्रय घेतील

Bihar Assembly Elections 2020, Union minister Nityanand Rai, controversial statement, RJD

पाटणा, १४ ऑक्टोबर : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा सुरू झाल्या आहेत. प्रचारसभांमधून आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. याच दरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. नित्यानंद राय यांनी बिहार निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा (आरजेडी) विजय झाल्यास दहशतवादी काश्मीरमधून बिहारमध्ये आश्रय घेतील अशी भीती व्यक्त केली आहे. नित्यानंद राय यांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.

वैशाली जिल्हातील महनारमध्ये एका प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी लोकांना संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं आहे. “बिहारमध्ये आरजेडी सत्तेत आल्यास दहशतवादी काश्मीरमधून पलायन करुन बिहारमध्ये आश्रय घेतील” असं नित्यानंद राय यांनी म्हटलं आहे. राय यांच्या वादग्रस्त विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आरजेडी प्रवक्ता अन्वर हुसैन यांनी भाजपा नेते भीतीपोटी अशी वक्तव्यं करत असल्याची टीका केली आहे.

 

News English Summary: Union Minister of State for Home Affairs Nityanand Rai courted controversy after he stated that terrorists from Kashmir would come and take shelter in Bihar if the RJD wins the upcoming Assembly election in the state. Rai, a BJP leader, made the remark while addressing a rally in Vaishali’s Mahanar constituency. His comment on October 12 was much similar to the 2015 statement of a prominent BJP leader who had said ‘if Mahagathbandhan wins the election, crackers will be burst in Pakistan’.

News English Title: Bihar Elections 2020 Union minister Nityanand Rai controversial statement says if RJD will won terrorist will take shelter in Bihar News Updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x