2 May 2025 9:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

तुम्ही गेल्या वर्षी लोकांना थाळ्या-टाळ्या वाजवायला सांगितल्या, त्याने काय झाले? | दुसऱ्या लाटेला मोदी सरकारच जवाबदार

MIM MP Asaduddin Owaisi

नवी दिल्ली, २७ एप्रिल | भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत थोडी फार घट होताना दिसत आहे.भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख २३ हजार १४४ रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान २७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ इतकी झाली आहे. तर २७७१ मृत्यूंसोबत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ९७ हजार ८९४ वर पोहोचली आहे.

दरम्यान देशात गेल्या २४ तासांत २ लाख ५१ हजार ८२७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून आतापर्यंत १ कोटी ४५ लाख ५६ हजार २०९ जणांनी करोनावर मात केली आहे. देशात सध्याच्या घडीला २८ लाख ८२ हजार २०४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १४ कोटी ५२ लाख ७१ हजार १८६ जणांचं लसीकरण झालं आहे.

दरम्यान, देशात कोरोनाच्या थैमानामुळे सामान्य माणूस होरपळून निघालेला असताना ओवेसी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, आपण गेल्या वर्षी लोकांना थाळ्या आणि टाळ्या वाजवायला सांगितले होते, त्याने काय झाले? देशातून कोरोना पळाला?”

ओवेसी म्हणाले पंतप्रधान मोदींनी रुग्णालायांतीत सुविधा का वाढविल्या नाहीत? केंद्र सरकार तेव्हापासून झोपले होते का? देशाच्या राजधानित ऑक्सिजन का कमी पडतोय? आपण आत्मनिर्भर भारत आहोत, तर सौदी अरेबिया, रशिया आणि इतर देशांची मदत का घेत आहोत. मृतांचे दफन केले जात आहे. शव जाळले जात आहेत. आणि मोदी सरकारला रक्ताचा सुगंध येत आहे. मोदी सरकार अदृश्य झाले आहे. आमच्याकडे MP फंड असता, तर आम्हाला लोकांना ऑक्सिजन अथवा औषधी देता आली असती. मात्र, आता काहीही नाही, असे ओवेसी म्हणाले.

मोदी सरकारने पीएम केअर्स फंडातील पैसे काढून राज्य सरकारांना द्यायला हवेत. जेने करून त्यांना कोरोना लसीकरणाचा वेग वाढवता येईल, असे म्हणत, सध्या देशात कोरोना लशींच्या तुटवड्याची चर्चा सुरू आहे. असे असेल, तर यापूर्वीच फायझर कंपनीला भारतात लस लॉन्च करण्याची परवानगी का देण्यात आली नही, असा सवालही ओवेसींनी उपस्थित केला.

 

News English Summary: MIM MP Asaduddin Owaisi has strongly criticized the Modi government while the common man has fled the country due to the coronation. That said, you asked people to clap and clap last year, what happened to that? Corona fled the country?

News English Title: MIM MP Asaduddin Owaisi criticized Modi Govt over Indian corona pandemic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या