29 April 2024 2:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस

India corona pandemic

मुंबई, १५ मे | देशात कोरोनामुळे मृत्यूंचा आकडा २.६२ लाखांच्या वर पोहोचला आहे. दुसरीकडे, सध्या उत्तर प्रदेशातील कानपूर, कन्नौज, उन्नाव, गाझीपूर आणि बलियामधील परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि इथलं भीषण वास्तव देखील समोर आलं आहे. वास्तवात समोर येणारं चित्र हे अत्यंत भीषण असून योगी सरकार हतबल असल्याचं पाहायला मिळतंय.

उत्तर प्रदेशातील बड्या शहरांपैकी एक कानपूरमधील शेरेश्वर घाटाजवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर अनेक मृतदेह पुरण्यात आले आहेत. येथील परिस्थिती खूपच भयावह असल्याचे सांगितले जाते. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त मृतदेहांना जमिनीत पुरलेले दिसत होते. काही मृतदेहांचे कुत्रे लचके तोडत होते तर काहींवर गरुड व कावळे बसलेले दिसले. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांची टीमही येथे पोहोचली. त्यानंतर पोलिसांकडून प्रत्येक मृतदेहावर माती टाकण्याचे काम सुरू झाले.

कोरोना काळातील सर्वात मोठी स्मशानभूमी उन्नावमध्ये असल्याचे दिसून येत आहे. कारण येथीलच शुक्लगंज घाट आणि बक्सर घाटाजवळ 900 हून अधिक मृतदेहांचे दफन करण्यात आले आहे. दरम्यान, तेथे प्रत्येक चरणात मानवी अवयव विखुरलेले दिसतात. सध्या घाई गडबडीत सर्व मृतदेहांना वाळूत पुरुन टाकण्याचं काम सुरु आहे. विशेष म्हणजे धर्माने हिंदू असलेल्या रुग्णांचे अग्निदहन होण्याऐवजी त्यांना दहन करण्याची वेळ आल्याने मोठ्या प्रमाणावर संताप देखील व्यक्त होताना दिसत आहे.

याच विषयाला अनुसरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे-पाटील यांनी भाजपवर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. यासंदर्भात ट्विट करताना अतुल लोंढे-पाटील यांनी म्हटलंय की, “५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेविषयी बोलणारे मोदी आणि योगी सरकार उत्तर प्रदेशातील जनतेला अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था देखील देऊ शकत नाहीत, ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक

 

News English Summary: Modi and Yogi, who talk about the $ 5 trillion economy, are not able to even arrange for cremation to the public in Uttar Pradesh. The one who is to be burnt is being buried. He is called the Hindurakshak said Congress spokesperson Atul Londhe Patil.

News English Title: Congress spokesperson Atul Londhe Patil slams BJP govt over many dead bodies found at Ganga ghat news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x