नवी दिल्ली : आज ७२ वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशाच्या राजधानीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर देशाला संबोधित करताना अनेक मुद्दे मांडले आणि भविष्यातील योजनांची जनतेला माहिती करून दिली.
दरम्यान मुंबईमध्ये राजभवनामध्ये राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. तर मुख्यमंत्री फडणवीस याच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आले.
स्वतंत्रदिनच्या निमित्ताने सरकारी कार्यालये, प्रसिद्ध वास्तू, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मंत्रालय, मुंबई महानगरपालिकेची इमारत तसेच विधानभवन तिरंग्याच्या रोषणाईमुळे उजळून निघाले आहे. एकूणच सर्वत्र उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे.
