6 May 2024 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार
x

देश अंबानी, अदानींच्या हातात सोपवला जातोय | भविष्यात गंभीर परिणाम होतील - मेधा पाटकर

Medha Patkar

अमरावती, २३ सप्टेंबर | अंबानी आणि अदानींच्या हाती हा देश सोपवला जात आहे. याचे परिणाम भविष्यात फार गंभीर होतील. यामुळेच सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. कृषी कायद्याविरोधातील आंदोलन हे समाजातील प्रत्येक घटकासाठीचे आंदोलन आहे. यामुळे या आंदोलनात देशातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मेधा पाटकर यांनी केले. त्या पत्रकारांशी बोलत होत्या. बुधवारी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात फासेपारधी समाजाच्या प्रश्नचिन्ह या शाळेला भेट देण्यासाठी मेधा पाटकर अमरावतीत आल्या होत्या.

देश अंबानी, अदानींच्या हातात सोपवला जातोय, भविष्यात गंभीर परिणाम होतील – Country is being handed over to Ambani Adani there will be serious consequences in the future said social activist Medha Patkar :

नशा मुक्तीसाठी शासनाच्या वतीने अनेक कार्यक्रम राबवले जातात. खरतर नशामुक्तीपेक्षा भुक मुक्ती आणि बेरोजगार मुक्ती ही काळाची खरी गरज आहे. कृषी कायद्यामुळे भविष्यात अन्नसुरक्षा धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळे केवळ शेतकरीच नाही, तर राशन धान्य दुकानावर अवलंबून असणाऱ्या सामान्य नागरिकांचाही जेवणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे समाजाने आता जागृतपणे विचार करण्याची गरज असल्याचे मतही मेधा पाटकर यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

कोरोना काळामध्ये अंबानी अदानी सारखे मूठभर उद्योजक श्रीमंत होत असून, अशा परिस्थितीतही शेती क्षेत्र त्यांच्याच घशात घालण्याचे षडयंत्र केंद्र सरकारने रचले आहे. श्रमीकांच्या 44 कायद्यांपैकी 29 कायदे या सरकारने परत घेतले आहेत. त्यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. भूमी अधिग्रहण कायद्यामुळेही शेतकऱ्यांच्या जमिनी नष्ट होत आहेत. त्यामुळे सध्या सरकार केवळ जातीयवाद धर्मांधता याद्वारे सत्ता हस्तगत करू पहात आहे, अशी टीका मेधा पाटकर यांनी यावेळी केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Country is being handed over to Ambani Adani there will be serious consequences in the future said social activist Medha Patkar.

हॅशटॅग्स

#Modi(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x