
IRCTC Railway Ticket | लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कन्फर्म ट्रेनचे तिकीट मिळवणे सोपे काम नाही. दिवाळी, छठ सारख्या सणांच्या निमित्ताने तिकीट मिळवणं हे अवघड काम असतं. यातील काही समस्या सोडविण्यासाठी रेल्वेची ‘विकल्प योजना’ आहे. रेल्वेमध्ये तिकीट बुक करताना भारतीय रेल्वे प्रवाशांना कल्प योजना देते. त्यामुळे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. जाणून घेऊया ही रेल्वे योजना कशी काम करते.
प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळावे या उद्देशाने भारतीय रेल्वेने २०१५ मध्ये विकल्प योजना सुरू केली होती. पर्यायी रेल्वे निवास योजनेला (एटीएएस) रेल्वेने विकल्प असे नाव दिले आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रवाशांना जास्तीत जास्त कन्फर्म तिकिटे देण्याचा रेल्वेचा प्रयत्न असतो. याअंतर्गत प्रवासी ऑनलाइन वेटिंग तिकीट बुक करताना कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी दुसऱ्या ट्रेनचा ही पर्याय निवडू शकतात.
विकल्प योजना कशी निवडावी
विकल्प योजनेमुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. जेव्हा आपण ऑनलाइन रेल्वे तिकिटे बुक कराल, तेव्हा आपल्याला आपोआप ओटीपी पर्याय सुचविला जाईल. या ऑप्शनमध्ये तुम्हाला ज्या ट्रेनमध्ये वेटिंग तिकीट मिळालं आहे, त्या ट्रेनव्यतिरिक्त तुम्हाला त्या मार्गावरील इतर गाड्यांचीही निवड करण्यास सांगितलं जातं.
विकल्प योजनेअंतर्गत रेल्वे प्रवासी ऑनलाइन तिकीट बुकिंग करताना याची निवड करू शकतात. कोणत्याही पर्यायी ट्रेनमध्ये सीट किंवा बर्थ उपलब्ध असेल तर त्यांनी निवडलेल्या कोणत्याही ट्रेनमध्ये सीट/बर्थ आपोआप दिली जाईल. बुक केलेल्या तिकिटाच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्ही हा पर्याय तपासू शकता.
आपण 7 ट्रेन निवडू शकता
विकल्प योजनेअंतर्गत तुम्ही 7 गाड्यांची निवड करू शकता. ही ट्रेन बोर्डिंग स्टेशनते डेस्टिनेशनपर्यंत ३० मिनिटांपासून ७२ तासांपर्यंत धावायला हवी. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जर आपण विकल्प योजनेचा पर्याय निवडला असेल तर याचा अर्थ असा नाही की आपल्याला 100% कन्फर्म तिकीट मिळेल.