3 May 2025 10:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

बीएसएनएल'च्या बिकट आर्थिक स्थितीमुळे कर्मचाऱ्यांची व्हीएसआर'ला मोठी पसंती: सविस्तर वृत्त

BSNL, MTNL, Telecom

नवी दिल्ली : ठरल्याप्रमाणे दूरसंचार क्षेत्रातील बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली. त्याद्वारे ८० हजार कर्मचारी कमी होतील, असा अंदाज आहे. या कंपन्यांच्या विलीनीकरणाचा निर्णय सरकारने आधीच घेतला आहे.

ही योजना ४ नोव्हेंबर रोजी सुरू झाली असून, ३ डिसेंबरपर्यंत त्यासाठी अर्ज करता येतील. बीएसएनएलच्या दीड लाख कर्मचाऱ्यांपैकी १ लाख कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेता येईल. ज्या कर्मचाऱ्यांचे वय ३१ जानेवारी २०२० रोजी ५० वा त्याहून अधिक असेल, त्यांच्यासाठी ही योजना आहे. या योजनेद्वारे ८० हजार कर्मचारी निवृत्त झाल्यास बीएसएनएलचे वर्षाला ७ हजार कोटी वाचतील. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रादेशिक कार्यालयात अर्ज करायचे आहेत.

दरम्यान, सरकारची अथिति स्थिती, धक्कादायक निर्णय आणि खाजगीकरणाच्या सपाट्याने बिथरलेले सरकारी कर्मचारी नोकरी सोडणं पसंत करत आहेत. परिणामी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी दूरसंचार कंपनीत केंद्र सरकारने लागू केलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या ७७ हजारांवर पोहोचली आहे. बीएसएनएलमध्ये एकूण दीड लाख कर्मचारी असून यातील एक लाख कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी पात्र आहेत. यातील किमान ७७ हजार कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी कंपनीचे अधिकारी प्रयत्नशील होते. त्यामुळे हे उद्दिष्ट जवळपास पूर्ण झाल्याचे दिसत आहे.

बीएसएनएलच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज तेव्हाच येतो जेव्हा मुंबईतील काही कार्यालयांचं वीज बिल न भरल्याने वीज मंडळाने बीएसएनएलची बत्ती गुल केली होती. मुंबईतील गोरेगाव मुख्य केंद्राकडे १३ लाख ४५ हजार रुपयांचे वीज बिल थकल्याने वीज वितरण कंपनीने या कार्यालयाचा आणि या अंतर्गत तब्बल ८ उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित केला. विशेष म्हणजे ६ महिन्यापूर्वी सुध्दा या कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.त्यानंतर आता पुन्हा थकीत वीज बिलामुळे पुरवठा खंडित करण्यात आल्याने या सरकारी कंपन्यांची अर्थिक परिस्थिती कशी असेल याची चुणूक कर्मचाऱ्यांना लागली आहे आणि त्यामुळे आलेली संधी न दवडता त्यांनी व्हीआरएस स्वीकारणं पसंत केल्याचं म्हटलं जातं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या