नाशिक : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत किसान सभेच्या शिष्टमंडळाने बुधवारी रात्री तब्बल दीड तास चर्चा केली. परंतु, ही चर्चा पूर्णतः निष्फळ ठरली आहे. कारण या चर्चेतून लॉंग मार्च रोखण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची तोडगा निघू शकलेला नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांचा लाँग मार्च निघणारच असल्याचे अजित नवले यांनी सांगितले. मोर्चातील वाहने मुंबईच्या दिशेनं रवाना झाली आहेत. त्यामुळे मुंबई नाका परिसरात वाहतूक कोंडी, बारावी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थांचे हाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेतकऱ्यांसंदर्भात राज्यपातळीवर चर्चा सुरू असून सकारात्मक तोडगा निघाल्यास मोर्चा स्थगित होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
