नवी दिल्ली : देशातील रोख रक्कमेत होणार्‍या व्यवहारांमुळे काळ्या पैशाच्या निर्मितीला चालना मिळते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटबंदी जाहीर केली. मात्र रोख रक्कमेवर मर्यादा घालण्याचा हा प्रयत्न पूर्णपणे फसला. मार्च २०१९ पर्यंत नोटांचे प्रमाण १९.१४ टक्क्यांनी वाढले आहे. चलनातील एकूण नोटा २१.४१ लाख कोटी एवढ्या आहेत.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या अहवालात ही नोटांची संख्या देण्यात आली आहे. नोटबंदी होण्यापूर्वी ४ नोव्हेंबर २०१६ रोजी भारताच्या अर्थव्यवस्थेत १७.९७ लाख कोटी रुपयांची रोकड होती. नोटबंदीनंतर नवीन नोटा छापण्यास प्रचंड वेळ लागत असल्यामुळे नोटांच्या रोकडीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले होते. मात्र गेल्या दोन वर्षांत हे नोटांच्या रोकडीचे प्रमाण पूर्वीपेक्षाही वाढले आहे.

भारतातील लोक आजही सर्व व्यवहार रोखीने करतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेत रोकड वाढते. नरेेंद्र मोदी यांनी नोटबंदी केल्यानंतर बहुतेक व्यवहार डिजिटल करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्नही फारसा यशस्वी झालेला नाही. नोटबंदीनंतर ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून मोदींनी संपूर्ण देशाला नोटांसाठी बँकेबाहेर रांगा लावाव्या लागल्या होत्या व रांगेत अनेकजण मृत्यू पावले होते. मोेदींची नोटबंदी पूर्णपणे फसली हेच यातून सिद्ध होते.

Intentions of demonetization are totally failed says rbi report