मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१८-१९ या वर्षाचे पतधोरण जाहीर करताना रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे पूर्वीचा रेपो दर ६.२५ टक्के तर रिव्हर्स रेपो दर ६ टक्के असेल. त्यामुळे ग्राहकांसाठी एक वाईट बातमी अशी या निर्णयामुळे महागाईही वाढण्याची चिन्हं असून कर्जाचा हप्ता सुद्धा वाढणार आहे.
आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या नव्या पतधोरणामुळे अजून जास्त महागाईत होरपळून जाऊ शकतो. तसेच कर्जाचा हफ्ता सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या चार वर्षाच्या कार्यकाळात भारतीय रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदाच रेपो दर वाढविले आहेत.
२०१८-१९ या वर्षाचे पतधोरण आजच जाहीर झाल्याने त्याचे इतर परिणाम लवकरच दिसायला सुरवात होईल.
