नवी दिल्ली : केवळ विरोधकांनीच नव्हे तर आता खुद्द जागतिक बँकेनेच (वर्ल्ड बँक) भारतातील जीएसटी करप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतातील जीएसटी करप्रणाली ही सर्वात किचकट करप्रणाली असल्याचा शेरा वर्ल्ड बँकेने मारल्याने मोदी सरकारची चांगलीच अडचण झाली आहे.

जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या एकूण ११५ देशांच्या करप्रणालीत भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले आहे. जागतिक बँकेच्या त्या करप्रणालीबाबतच्या अहवालात भारतातील जीएसटी करप्रणालीला सर्वात किचकट करप्रणाली असल्याचे नमूद केलं आहे.

भारतात जुलै २०१७ मध्ये जीएसटी संपूर्ण देशात लागू करण्यात आला ज्यामध्ये एकूण ५ स्लॅब आहेत. त्यातील रिफंड देण्याच्या प्रक्रिया मंदावल्याने वर्ल्ड बँकेने अहवालात चिंता व्यक्त केली आहे. कारण रिफंड मिळण्याला उशीर होतो आणि परिणामी उद्योगाचे अर्थकारण गडबडून त्याचा थेट दुष्परिणाम उद्योगावर होतो असा शेरा सुद्धा वर्ल्ड बँकेने अहवालात मारण्यात आला आहे आणि जीएसटी प्रणालीत सुधारणा करावी आणि टॅक्स स्लॅब कमी करून प्रक्रिया सुटसुटीत करावी असा सल्ला सुद्धा वर्ल्ड बँकेने भारत सरकारला दिला आहे.

जागतिक बँकेच्या या जीएसटी कारप्रणालीमधील शेऱ्याने मोदी सरकार आता काय उपाययोजना करते या कडेच सर्वांचे लक्ष आहे.

world bank criticised gst system of India