रत्नागिरी रिफायनरी | कोकणी माणसाच्या आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा धोक्यात, प्रकल्पावरून शिंदे समर्थक कोकणी जनतेच्या विरोधात

Ratnagiri Refinery Project Protest | कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी एका बाजूला सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे तर दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून प्रकल्पाला विरोध केला जात आहे. या प्रकरणी आतापर्यंत काही जणांना अटकही करण्यात आली आहे. सोमवारी रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना राजापूरमध्ये अटक करण्यात आली. त्यांसोबत आणखी दोन सहकाऱ्यांनाही अटक केली असून तिघांनाही रत्नागिरीत ठेवण्यात आले आहे.
रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरू आहे. प्रशासनाकडून इशारा दिल्यानंतरही स्थानिकांकडून आंदोलन सुरूच ठेण्यात आलं आहे. अनेक आंदोलक सर्वेक्षणाच्या जागेवर ठिय्या मांडून होते. राजापूर तालुक्यातील तहसिलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनीही स्थानिकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पण प्रकल्प हद्दपार होणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांची आहे.
गावांची जमीन या प्रकल्पासाठी देण्यात येणार
बारसू सोलगाव आणि पश्चिम भागातील काही गावांची जमीन या प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. रिफायनरीसाठी जवळपास चौदा हजार एकर जागा आणि बंदरासाठी जवळपास 2414 एकर जागा देण्यात येणार आहे. सर्वेक्षणाबाबत स्थानिकांशी चर्चा करण्यासाठी महसूल अधिकारी, राजापूरचे तहसीलदार, प्रांतअधिकारी बारसू गावात दाखल झाले आहेत.
भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात क्रूड ऑईल रिफाईन करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उदयोग’ प्रस्तावित आहे. महाराष्ट्र शासन या प्रकल्पासाठी आग्रही असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे सदर प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर, नाटे या परिसरात नियोजित आहे. आधी हा प्रकल्प नाणारमध्ये प्रस्तावित होता. मात्र नाणार परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करण्यास ग्रामस्थांकडून विरोध केला गेला. त्यानंतर आता शासनाकडून बारसू-सोलगाव परिसरामध्ये त्याची उभारणी करण्याची चाचपणी सुरू झाली आहे.
प्रचंड वायू आणि जल प्रदूषणाने आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा धोक्यात
कोकणाला निसर्गाने भरभरुन दिलं आहे. आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा ही कोकणची संपत्ती आहे. मात्र रिफायनरीमुळे ही संपत्ती धोक्यात येईल, अशी स्थानिकांची भूमिका आहे. याशिवाय कोकणातील रहिवाशांचा मासेमारी हा प्रमुख रोजगार आहे. मात्र रिफायनरीमुळे समुद्रात गरम पाणी आणि आणखी काही घटक सोडले जातील यामुळे मासेमारीवर परिणाम होईल, जैवविविधतेवर धोका निर्माण होईल आणि याचा कोकणाच्या अर्थचक्रावर परिणाम होईल. शिवाय या प्रकल्पामुळे आपल्या जमिनी धोक्यात येतील, अशा काही प्रमुख कारणांमुळे कोकणात नाणार पाठोपाठ बारसू, सोलगावमध्येही रिफायनरी प्रकल्पाचा विरोध होत आहे.
शिंदे समर्थक कोकणी जनतेच्या विरोधात
स्वतःला कोकणाचे नेते समजणारे आणि शिंदे समर्थक उद्योगमंत्री उदय सामंत मात्र यांचं कोकणी जनतेच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. उदय सामंत यांनी म्हटले की काही लोक समर्थन करत आहे. त्याबद्दलही बोलले पाहिजे. ज्या ठिकाणी शंभर बोर मारायचे होते. त्यातले 50 बोरची लोकांनी परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की शंभर टक्के विरोध आहे. जो विरोध आहे तो गैरसमाजातून आहे.
ज्यांचा गैरसमज झाला आहे. त्यांचा गैरसमज काढला जाईल. आजच प्रकल्प होणार नाही. कंपनीला वाटेल की आम्ही या ठिकाणी आता प्रकल्प करू शकतो. त्यावेळेस प्रकल्पाची सुरुवात होणार आहे. राजकीय वातावरण कुठेतरी तयार करायचा प्रयत्न केला जातो आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Ratnagiri Refinery Project Protest controversy check details on 25 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल