नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत मतदान पार पडणार असून ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही निवडणूक आयोगाने यावेळी केली. दिल्लीत एक कोटी ४६ लाख मतदार आहेत. दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच दिल्लीत मात्र राजकीय वातावरणं चांगलंच तापलं आहे. सोबतच दोन मुद्द्यांवर गूढ कायम आहे. एक म्हणजे या निवडणुकीत भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार आहे ? आणि दुसरं म्हणजे सुधारित नागरिक्तव कायद्याचा निवडणुकीत काय परिणाम होईल?.
२२ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. दिल्लीमध्ये ७० विधानसभा जागा असून गेल्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने ६७ जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला होता.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने आधीच प्रचाराला सुरुवात केली असून स्वतः अमित शहा यांनी केजरीवाल साकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, २०१४ मध्ये देशभरात १०० स्मार्ट-सिटी उभ्या करण्याची घोषणा होऊन एकही स्मार्ट सिटी देशात उभी राहिलेली नाही. परंतु, सध्या तेच अमित शहा दिल्लीत फुकट वायफाय’ची रेंज शोधताना दिसत आहेत हे विशेष म्हणावे लागेल.
राजधानी दिल्लीत सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात संबोधित करताना अमित शाह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारवर हल्लाबोल केला. केजरीवाल यांनी दिल्लीत १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सांगितले होते. मात्र, हे कॅमेरे कुठे लावले आहेत, याचा शोध दिल्लीतील जनता घेत आहे. वायफाय शोधता-शोधता लोकांच्या फोनमधील बॅटरी संपून जाते. पण, वायफाय काही मिळत नाही, असे सांगत अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल सरकारवर निशाणा साधला.
गत 60 महीनों में आम आदमी पार्टी की सरकार ने सिर्फ और सिर्फ वादे किये और अब अंतिम 3 महीने में जनता के विकास के पैसे को अपनी घोषणाओं के विज्ञापनों पर खर्च किया। दिल्ली के लोग आज भी फ्री wifi, 15 लाख CCTV कैमरे, नये कॉलेज और अस्पतालों की राह देख रहें हैं।
— Amit Shah (@AmitShah) January 6, 2020
Web Title: Delhi Assembly election 2020 BJP President Amit Shah WIFI CCTV camera Chief Minister Arvind Kejriwal.
